शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

करोडपती वाणाचे सोयाबीन ठरले निकृष्ट!

By admin | Updated: September 16, 2014 18:34 IST

शेतकर्‍यांनी उभे पीक उपटून फेकले

धाड : करोडपती नावाचे वाण असलेल्या सोयाबीन पिकास फूल व फळ धारणा होत नसून, सोयाबीन पीक निकृष्ट निघाल्याने धाड भागात शेतकर्‍यांनी उभे हिरवे सोयाबीन उपटून फेकण्यास सुरुवात केली आहे.बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात कधी निसर्गाचे संकट तर कधी सुलतानी संकटाने अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांवर शेतामधील उभे हिरवे पीकच उपटून टाकण्याची वेळ येऊन ठेपल्याने शेतकरी आर्थिक संकटात चांगलाच फसला आहे.गेल्या काही वर्षात धाड व परिसरात शेतकर्‍यांचा कल हा कमी खर्चात अधिक उत्पन्न देणार्‍या सोयाबीन पिकाकडे झाला असून, या भागात सर्वाधिक प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात येते.मागील दोन वर्षांपासून धाड भागात ह्यकरोडपतीह्ण नावाने सोयाबीनचे नवे वाण बाजारात आले. हे पीक एकरी १५ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पन्न देत असल्याने या वाणाची पेरणी यावर्षी अंदाजे ५00 एकरावर झाली आहे.या वाणाच्या पिकास फूल व फळधारणा झाली नसल्याने शेतकरीवर्ग पुरता हवालदिल झाला. टोकण पद्धतीने लागवड केलेल्या या वाणास झडती चांगली येत असल्याने शेतकर्‍यांनी अधिक प्रमाणात यावर खर्च केला आहे. अधिक उत्पन्न पदरी पडण्याची आशा बाळगून असलेल्या शेतकर्‍यांवर निसर्गाने घाला घातला असून, सध्या हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी शेवटी नाइलाजास्तव सोयाबीन पीक उपटणे सुरू केले.करोडपती नावाने उदयास आलेल्या सोयाबीन पिकांचे झाडांना फुले व फळे लागण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकर्‍यांनी कृषी केंद्रधारकांना सल्ला विचारून महागडे औषध फवारले; मात्र परिणाम शून्य आल्याने शेवटी उभे हिरवे पीक उपटून टाकण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय उरला नाही.अगोदरच निसर्गाच्या सततच्या संकटांनी दबलेल्या शेतकर्‍यांना आणखी एका संकटास सामोरे जाण्याची वेळ आली आहे. करोडपती नावाने व टोकण पद्धतीने पेरणी केलेले सोयाबीन पीक सध्या पिवळे पडले असून, सोयाबीन सुकण्याच्या मार्गावर आहे. या स्थितीने हैराण झालेल्या शेतकर्‍यांनी शेवटी सोयाबीन उपटणे सुरू केले; मात्र या भागात खरिपाचे सोयाबीन पीक धोक्यात सापडले असताना कृषी विभागास याबाबत साधी माहिती नसल्याने कार्यवाही केली नाही वा शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले नाही. परिणामी या भागात शेतकरी वर्गातून रोष व्यक्त होत आहे. या भागात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ मदत देण्याची मागणी समोर येत आहे.