शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अकोट नगरपालिकेतील आढावा बैठकीलाच गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:19 IST

अकोट नगरपरिषद सभागृहात सोमवारी सकाळी प्रशासनाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीसह पालिका परिसरातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसून आली. ...

अकोट नगरपरिषद सभागृहात सोमवारी सकाळी प्रशासनाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीसह पालिका परिसरातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसून आली. एकीकडे शहरात कडेकोट बंद असताना, पालिका प्रशासनाकडून नियमांची उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.

बैठकीला झालेली राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी पाहता, हा राजकीय पक्षाचा मेळावा की प्रशासनाचा आढावा, हेच कळत नव्हते. अकोट उपविभागातील कोरोना महामारी संदर्भात माहिती घेणे, सूचना देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक अकोट नगरपरिषद मध्ये १० मे रोजी घेतली. बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. कंन्टेन्मेट झोन व इतर समन्वय नसल्याने अधिकारी व कर्मचारी समाधानकारक काम करत असल्याबद्दल बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. अकोट-तेल्हारा येथील सर्वच महत्त्वाचे विभागाचे अधिकारी, कर्मचारी आले होते. अकोट उपविभागातील शासकीय यंत्रणाच्या आढावा बैठकीला नगराध्यक्ष, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी हजर होते, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो:

बैठक नव्हे, राजकीय मेळावा

विशेष म्हणजे, या बैठकीत व नगरपरिषद परिसरात राजकीय पक्षाचे जिल्हा पातळीवरील आजी-माजी पदाधिकारी, स्थानिक तालुका व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. त्यामुळे नगरपरिषदेमध्ये राजकीय पक्षांचा मेळावा की प्रशासनाचा आढावा, हे उमगेना. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. शासनाचे नियमाचे उल्लंघन

होऊ नये, याकरिता आदेश पारीत केले, परंतु आढावा बैठकीतच नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

ऑनलाइन बैठक का नाही घेतली.

अकोट नगरपरिषद कार्यालयात राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची झालेली गर्दी ही कोरोना संसर्ग वाढीसाठी होती का, असा प्रश्न निर्माण होत आहे. केंद्र व राज्य शासन ऑनलाइन सभा, बैठकी घेत असताना, अकोट नगरपरिषद कार्यालयात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. राजकीय मेळावा असल्याचे चित्र पाहून अधिकारी-कर्मचारी हतबल दिसत होते, परंतु या बैठकीतून नेमके साधायचे होते आणि यातून आता काय साध्य होणार आहे. असे प्रश्न उपस्थित होत आहेत.