शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उष्णतेच्या लाटेने पिके होरपळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:02 IST

संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व इतर पिकांवर दुष्परिणाम दिसून येत आहे

अकोला : विदर्भात तापमानाचा पारा ४७ अंशाच्या वर गेल्याने याचे परिणाम भाजीपाला पिकावर दिसून येत असून, ही पिके सुकू लागली आहेत.यावर्षी मे महिना उघडताच तापमानात वाढ होत असून, गत दोन-तीन दिवसांपासून पारा अचानक वाढला आहे. अकोल्याचे तापमान ४७.४ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे अकोला जिल्हा होरपळला असून, घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. तापमानामुळे बाष्पीभवन वाढत असून, पाणी दिले तरी जमिनीतील ओलावा कमी होत आहे. अनेक भागात पाण्याची पातळी खोल गेली आहे. बाष्पीभवन होत असलेल्याने फळे, भाजीपाला पिके होरपळली आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व इतर पिकांवर दुष्परिणाम दिसून येत आहे. अनेक भागात पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि अशातच तापमान वाढल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.अकोला जिल्ह्यात संत्रा, लिंबू या या फळपिकाच्या भाजीपाला व इतरही उन्हाळी पिके घेतली जातात. सध्या संत्र्याचा आंबिया बहार आहे. तापमानामुळे या पिकाला फटका बसत आहे. येत्या काही दिवस ही उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याने या पिकाची काळजी घ्यावी लागणार आहे. पिकांना संरक्षित ओलित करावे लागणार आहे. जिल्ह्यात कांदा पीकही घेतले जाते, अलीकडे केळी पिकाचे क्षेत्र वाढले आहे. ज्यांच्याकडे अल्प पाण्याची सोय आहे, ते शेतकरी उन्हाळी पिकांची पेरणी करतात; परंतु मागील वर्षापासून शेतकº­यांवर संकट कोसळले असून, मागच्या वर्षी पावसाने झोडपले म्हणून ठिकाणचा उतारा कमी आला. आता उन्हाळी पीक लावले. फळपिके, भाजीपाला आला; परंतु उन्हाचा कहर सुरू झाला. मागील शंभर वर्षात प्रथमच ४७४ डिग्री तापमान वाढल्याने एकसुद्धा घरात येते की नाही, याची चिंता शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीTemperatureतापमान