शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिके धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आगर : येथून ज‌वळच असलेल्या उगवा शिवारात बागायती क्षेत्र वाढले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आगर : येथून ज‌वळच असलेल्या उगवा शिवारात बागायती क्षेत्र वाढले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज व भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली आहे; मात्र शिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

पाण्याची मुबलक सोय असल्याने उगवा परिसरातील शेतकरी बागायती शेतीकडे वळले आहेत. सद्यस्थितीत शिवारात खरबूज, टरबूज व भाजीपालावर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या पिके बहरलेली असताना पिके तोडणीला आली आहेत. त्यामुळे पिकांना पाण्याची आवश्यकता आहे; मात्र महावितरणच्या दुर्लक्षामुळे शिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. पाण्याअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. गत तीन महिन्यांत सहा ते सातवेळा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महावितरणने हे नुकसान भरून द्यावे व यासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शांताबाई वानखडे, रमेश पारस्कर, विजय देशमुख, महादेवराव निकामे, अशोक पारधी यांनी निवेदनातून केली आहे.

--------------------------------------------------------------------

मागील आठवड्यात तांत्रिक बिघाडामुळे उगवा येथील कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. एक-दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

- अजय भोकरे, शाखा अभियंता, उपकेंद्र, महावितरण, गांधीग्राम/ उगवा.