शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिके धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आगर : येथून ज‌वळच असलेल्या उगवा शिवारात बागायती क्षेत्र वाढले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आगर : येथून ज‌वळच असलेल्या उगवा शिवारात बागायती क्षेत्र वाढले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज व भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली आहे; मात्र शिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

पाण्याची मुबलक सोय असल्याने उगवा परिसरातील शेतकरी बागायती शेतीकडे वळले आहेत. सद्यस्थितीत शिवारात खरबूज, टरबूज व भाजीपालावर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या पिके बहरलेली असताना पिके तोडणीला आली आहेत. त्यामुळे पिकांना पाण्याची आवश्यकता आहे; मात्र महावितरणच्या दुर्लक्षामुळे शिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. पाण्याअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. गत तीन महिन्यांत सहा ते सातवेळा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महावितरणने हे नुकसान भरून द्यावे व यासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शांताबाई वानखडे, रमेश पारस्कर, विजय देशमुख, महादेवराव निकामे, अशोक पारधी यांनी निवेदनातून केली आहे.

--------------------------------------------------------------------

मागील आठवड्यात तांत्रिक बिघाडामुळे उगवा येथील कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. एक-दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

- अजय भोकरे, शाखा अभियंता, उपकेंद्र, महावितरण, गांधीग्राम/ उगवा.