शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पातूर तालुक्यातील ३१ हजार ५३६ हेक्टरवरील पिके धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:19 IST

संतोषकुमार गवई पातूर : तालुक्यात खरीप हंगामातील पिके बहरलेली असताना, गुरुवार, दि. २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ३१८० ...

संतोषकुमार गवई

पातूर : तालुक्यात खरीप हंगामातील पिके बहरलेली असताना, गुरुवार, दि. २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ३१८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ३१ हजार ५३६ हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आल्याचा अंदाज आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभी पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी, तर आता पिके बहरलेली असताना अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, यामुळे शेतकरी हतबल बनला असून, शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी होत आहे.

पातूर तालुक्यात गत आठवड्यातील अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात तालुक्यातील ५,७९० शेतकऱ्यांनी ३१८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. संततधार पावसाने अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेतात साचल्याने पिके पिवळी पडली, तर काही पिके सडली आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जून ते जुलैच्या सहा आठवड्यांच्या कालावधीत पावसाअभावी पिकांची उत्पादन क्षमता घटली होती. आधी पावसाअभावी आणि आता पावसामुळे शेती पिकांची अवस्था दयनीय बनलेली आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. सद्यस्थितीत पिके बहरलेली असताना अतिवृष्टीमुळे शेतीचे कमालीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

(फोटो)

-----------------

तालुक्यातील पाचही महसूल मंडलात अतिवृष्टी

बदलत्या वातावरणाचा सार्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. तालुक्यातील पाचही महसुली मंडलात दि. २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाली आहे. पातूर मंडलात ८० मि.मी., बाभूळगाव मंडल ६५ मि.मी., चान्नी मंडल ६५.३० मि.मी., आलेगाव मंडल ७२ मि.मी., तर सस्ती मंडलात ६६.८० मि.मी., अशी एकूण तालुक्यात ६९.७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.