शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

पिकांचे उत्पादन बुडाले; खर्चही निघाला नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:12 IST

अकोला : कमी पावसामुळे जिल्हय़ात एकही खरीप पिकाचे  उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात राहिले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, लागवडीवर केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची जिल्हय़ातील नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देपैसेवारीचा गोंधळजिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी अवास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कमी पावसामुळे जिल्हय़ात एकही खरीप पिकाचे  उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात राहिले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, लागवडीवर केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची जिल्हय़ातील नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्हय़ात कमी पाऊस झाल्याने मूग, उडिदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ८0 टक्के घट झाली असून, ‘लाल्या’सारख्या किडीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाच्या उत्पादनाचेही काही खरे नाही. त्यामुळे एकही खरीप पिकाचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात आले नसून, पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला  आहे. खरीप पिकांच्या लागवडीसाठी केलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन झाले नसल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघाला नसल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. नापिकीमुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याच्या  परिस्थितीत जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी २९ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्हय़ातील लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे आहे. खरीप पिकांचे बुडालेले उत्पादन, पिकांच्या लागवडीवर करण्यात आलेला खर्चही वसूल झाला नसल्याने, नापिकीचे वास्तव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची असून, अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकर्‍यांसह शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

उडीद लागवडीवर     खर्च ६0 हजार; उत्पन्न मिळाले १५ हजार!सात एकर उडीद पिकाच्या लागवडीवर ६0 हजार रुपये खर्च केला. त्या तुलनेत पिकाच्या उत्पादनातून १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे उडीद पिकाच्या लागवडीवर केलेल्या खर्चाची रक्कमही वसूल झाली नाही, अशी व्यथा तुलंगा येथील शेतकरी समाधान सदार यांनी व्यक्त केली.

कमी पावसामुळे जिल्हय़ात मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. खरिपातील कोणत्याही पिकाचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात येण्याची शक्यता नसल्याने, जिल्हय़ात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पीक परिस्थितीचे वास्तव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे.-प्रदीप देशमुख, विदर्भ विभागीय चिटणीस, शेतकरी कामगार पक्ष.

मूग, उडीद पिकांचे उत्पादन झाले नाही. सोयाबीन पिकाचे ८0 टक्के उत्पादन बुडाले. कपाशी पिकाच्या उत्पादनाचेही खरे नाही. त्यामुळे खरीप हंगामातील एकही पीक शेतकर्‍यांच्या हातात राहिले नाही. नापिकीमुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने, शेतकरी संकटात सापडल्याची  परिस्थिती असताना जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी पूर्णत: अयोग्य आणि अवास्तव आहे.-प्रशांत गावंडे, जिल्हा समन्वयक, शेतकरी जागर मंच.