शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पिकांचे उत्पादन बुडाले; खर्चही निघाला नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:12 IST

अकोला : कमी पावसामुळे जिल्हय़ात एकही खरीप पिकाचे  उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात राहिले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, लागवडीवर केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची जिल्हय़ातील नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देपैसेवारीचा गोंधळजिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी अवास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कमी पावसामुळे जिल्हय़ात एकही खरीप पिकाचे  उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात राहिले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, लागवडीवर केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची जिल्हय़ातील नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्हय़ात कमी पाऊस झाल्याने मूग, उडिदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ८0 टक्के घट झाली असून, ‘लाल्या’सारख्या किडीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाच्या उत्पादनाचेही काही खरे नाही. त्यामुळे एकही खरीप पिकाचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात आले नसून, पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला  आहे. खरीप पिकांच्या लागवडीसाठी केलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन झाले नसल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघाला नसल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. नापिकीमुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याच्या  परिस्थितीत जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी २९ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्हय़ातील लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे आहे. खरीप पिकांचे बुडालेले उत्पादन, पिकांच्या लागवडीवर करण्यात आलेला खर्चही वसूल झाला नसल्याने, नापिकीचे वास्तव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची असून, अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकर्‍यांसह शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

उडीद लागवडीवर     खर्च ६0 हजार; उत्पन्न मिळाले १५ हजार!सात एकर उडीद पिकाच्या लागवडीवर ६0 हजार रुपये खर्च केला. त्या तुलनेत पिकाच्या उत्पादनातून १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे उडीद पिकाच्या लागवडीवर केलेल्या खर्चाची रक्कमही वसूल झाली नाही, अशी व्यथा तुलंगा येथील शेतकरी समाधान सदार यांनी व्यक्त केली.

कमी पावसामुळे जिल्हय़ात मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. खरिपातील कोणत्याही पिकाचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात येण्याची शक्यता नसल्याने, जिल्हय़ात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पीक परिस्थितीचे वास्तव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे.-प्रदीप देशमुख, विदर्भ विभागीय चिटणीस, शेतकरी कामगार पक्ष.

मूग, उडीद पिकांचे उत्पादन झाले नाही. सोयाबीन पिकाचे ८0 टक्के उत्पादन बुडाले. कपाशी पिकाच्या उत्पादनाचेही खरे नाही. त्यामुळे खरीप हंगामातील एकही पीक शेतकर्‍यांच्या हातात राहिले नाही. नापिकीमुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने, शेतकरी संकटात सापडल्याची  परिस्थिती असताना जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी पूर्णत: अयोग्य आणि अवास्तव आहे.-प्रशांत गावंडे, जिल्हा समन्वयक, शेतकरी जागर मंच.