शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पिकांचे उत्पादन बुडाले; खर्चही निघाला नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:12 IST

अकोला : कमी पावसामुळे जिल्हय़ात एकही खरीप पिकाचे  उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात राहिले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, लागवडीवर केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची जिल्हय़ातील नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देपैसेवारीचा गोंधळजिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी अवास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कमी पावसामुळे जिल्हय़ात एकही खरीप पिकाचे  उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात राहिले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, लागवडीवर केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याने, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची जिल्हय़ातील नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्हय़ात कमी पाऊस झाल्याने मूग, उडिदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात ८0 टक्के घट झाली असून, ‘लाल्या’सारख्या किडीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाच्या उत्पादनाचेही काही खरे नाही. त्यामुळे एकही खरीप पिकाचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात आले नसून, पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला  आहे. खरीप पिकांच्या लागवडीसाठी केलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पादन झाले नसल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघाला नसल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. नापिकीमुळे जिल्हय़ात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याच्या  परिस्थितीत जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी २९ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्हय़ातील लागवडीयोग्य ९९0 गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे आहे. खरीप पिकांचे बुडालेले उत्पादन, पिकांच्या लागवडीवर करण्यात आलेला खर्चही वसूल झाला नसल्याने, नापिकीचे वास्तव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी चुकीची असून, अवास्तव आहे, अशा प्रतिक्रिया जिल्हय़ातील शेतकर्‍यांसह शेतकरी नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

उडीद लागवडीवर     खर्च ६0 हजार; उत्पन्न मिळाले १५ हजार!सात एकर उडीद पिकाच्या लागवडीवर ६0 हजार रुपये खर्च केला. त्या तुलनेत पिकाच्या उत्पादनातून १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे उडीद पिकाच्या लागवडीवर केलेल्या खर्चाची रक्कमही वसूल झाली नाही, अशी व्यथा तुलंगा येथील शेतकरी समाधान सदार यांनी व्यक्त केली.

कमी पावसामुळे जिल्हय़ात मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. खरिपातील कोणत्याही पिकाचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हातात येण्याची शक्यता नसल्याने, जिल्हय़ात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पीक परिस्थितीचे वास्तव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी चुकीची आणि अवास्तव आहे.-प्रदीप देशमुख, विदर्भ विभागीय चिटणीस, शेतकरी कामगार पक्ष.

मूग, उडीद पिकांचे उत्पादन झाले नाही. सोयाबीन पिकाचे ८0 टक्के उत्पादन बुडाले. कपाशी पिकाच्या उत्पादनाचेही खरे नाही. त्यामुळे खरीप हंगामातील एकही पीक शेतकर्‍यांच्या हातात राहिले नाही. नापिकीमुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने, शेतकरी संकटात सापडल्याची  परिस्थिती असताना जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेली जिल्हय़ातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी पूर्णत: अयोग्य आणि अवास्तव आहे.-प्रशांत गावंडे, जिल्हा समन्वयक, शेतकरी जागर मंच.