शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

खरीप पेरणीच्या तोंडावर पीक कर्ज 'लॉकडाऊन'!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST

अनंत वानखडे बाळापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये बॅंकेचे व्यवहार सकाळी ...

अनंत वानखडे

बाळापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये बॅंकेचे व्यवहार सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत केवळ दोनच तास सुरू असणार आहेत. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत असून, पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारीत आहेत. अशातच बॅंकेची वेळ दोनच तास असल्यामुळे व्यवहारास अडचणी येत आहेत. ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर पीक कर्जही लॉकडाऊन झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. तसेच दररोज व्यवहार करणारे व्यावसायिकही अडचणीत सापडले आहेत.

जिल्ह्यातील वाढता कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी दि. १ जूनपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यात अनेक बंधने घालण्यात आली असून, बॅंकेच्या व्यवहारांना के‌वळ दोनच तास सूट मिळाली आहे. दरम्यान, सर्वसामान्य, नोकरदार व इतर व्यावसायिक या दोनच तासांमध्ये व्यवहार करणार असल्याने शेतकऱ्यांची फरपट होत आहे. शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीचे नियोजन सुरू केले असून, पीक कर्ज घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, बँकांकडून पीक कर्ज वाटपसंदर्भात कोणत्याही प्रकारची तयारी दिसून येत नसल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वांत मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात दुष्काळाने शेतकऱ्यांचे अर्थचक्र थांबविले आहे.

----------------------------------

महागाई वाढल्याने शेतकरी अडचणीत!

बी-बियाणे, रासायनिक खते, शेतीपयोगी साहित्य, साधनांची किमती वाढत्या महागाईमुळे गगनाला भिडल्या आहेत. दुष्काळ असतानासुद्धा शासनाने दुर्लक्ष करीत आर्थिक मदतीचा दिलासा दिला नसल्याने शेतकऱ्यांना कर्ज काढून शेतीला खर्च लावावा लागणार आहे. मात्र, पीक कर्जाचे नियोजन दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांवर खासगी सावकारांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे.

------------------------------------

पीक कर्ज प्रक्रियेची गती वाढवा!

शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचण सोडविण्यासाठी बँकांनी पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करून गती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना अवाजवी कागदपत्रांची मागणी करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

-------------------

खरीप हंगाम तोंडावर असल्याने पीक कर्जासाठी धावपळ सुरू आहे. अशातच बॅंकेचे व्यवहार केवळ दोनच तास सुरू आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन पीक कर्जासाठी वेगळी व्यवस्था करून शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज द्यावे.

- लक्ष्मण चोपडे, शेळद, शेतकरी.