शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अखेर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:19 IST

लोकमत इम्पॅक्ट प्रशांत विखे तेल्हारा : गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता; त्यांंना अद्यापही पीक विम्याची प्रतीक्षा ...

लोकमत इम्पॅक्ट

प्रशांत विखे

तेल्हारा : गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता; त्यांंना अद्यापही पीक विम्याची प्रतीक्षा होती. यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात होत असताना पीक विम्याची अधिकृत माहिती पीक विमा कंपन्यांकडून कृषी विभागाला देण्यात आली नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले असता पीक विमा कंपनीने तातडीने कृषी विभागाला माहिती सादर करून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्याला पीक विम्यापोटी ७७.९० कोटी रुपये मिळाले आहेत.

खरीप हंगामातील पिकांचा गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती तसेच हवामान खात्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उत्पादनात घट होऊन लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर यासह इतर पिकांचा विमा काढला असता विमा कंपनीने शेतकरी, राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून १३६ कोटी रुपये जिल्हाभरातून जमा केले. जिल्ह्याला पीक विम्यापोटी केवळ ७७.९० कोटी रुपयेच दिले आहेत.

सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान; एकाच मंडळाचा पीक विमा मंजूर

गतवर्षीच्या खरीप हंगामात सर्वात जास्त सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना जिल्ह्यातील केवळ तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण या एका मंडळातील शेतकऱ्यांनाच सोयाबीनचा पीक विमा मंजूर झाला असून, इतरांना फटका बसला आहे. तर एक मंडळ वगळता ५१ मंडळातील शेतकऱ्यांना मूग पिकाचा विमा मंजूर झाला आहेत. जिल्ह्यात एकूण ५२ मंडळे आहेत.

-------------------------------

अशी मिळाली पीक विम्याची मदत

पीक मंडळ मदत

उडीद ४१ ९ कोटी २३ लाख ४९ हजार रुपये

कपाशी २१ ४ कोटी ९ लाख ९६ हजार रुपये

मूग ५१ ४० कोटी ६९ लाख २९ हजार रुपये

तूर ३७ १९ कोटी ४७ लाख ८३ हजार रुपये

ज्वारी ३६ २ कोटी २० लाख ५९ हजार रुपये

सोयाबीन १२ कोटी १९ लाख ४९ हजार रुपये