शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

पीक विम्याच्या फरकाची रक्कम अखेर ३८० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST

अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आनलाईन पीक विमा काढल्यानंतर पीक विमा फरकाच्या रकमेपासून गेल्या दोन वर्षांपासून वंचित असलेल्या अकोला ...

अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आनलाईन पीक विमा काढल्यानंतर पीक विमा फरकाच्या रकमेपासून गेल्या दोन वर्षांपासून वंचित असलेल्या अकोला तालुक्यातील कौलखेड जहाॅगीर येथील ३८० शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अखेर पीक विम्याच्या फरकापोटी ९५ लाख ६९ हजार ७०० रुपयांची रक्कम ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीमार्फत ११ फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी शासनासह संबंधित यंत्रणांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, पीक विम्याच्या फरकाची प्रलंबित रक्कम खात्यात जमा झाल्याने, शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१९ मधील खरीप हंगामात अकोला तालुक्यातील पळसो महसूल मंडळ अंतर्गत कौलखेड जहाॅगीर येथील ऑनलाईन पीक विमा काढलेल्या ३८० शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी प्रती हेक्टर २३ हजार ७०० रुपयेप्रमाणे पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. परंतू मंजूर पीक विमा रकमेच्या तुलनेत विमा कंपनीकडून प्रती हेक्टर १४ हजार ४०० रुपये प्रमाणे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ९ हजार ३०० रुपयेप्रमाणे पीक विम्याची रक्कम कमी देण्यात आल्याने, पीक विमा रकमेच्या फरकाची ९५ लाख ६९ हजार ७०० रुपयांची रक्कम प्रलंबित होती. पीक विम्याच्या फरकाची रक्कम संबंधित विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली नसल्याने, पीक विम्याच्या फरकाची रक्कम कौलखेड जहाॅगीर येथील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आ.रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला होता. परंतू पीक विमा फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नसल्याने, यासंदर्भात ॲग्रीकल्चर इश्युरन्स कंपनीविरुध्द गुन्हा दाखल करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा तसेच पीक विमा फरकाच्या रकमेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी आ. सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती. तसेच यासंदर्भात कृषी आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठांकडे केली होती. अखेर संबंधित विमा कंपनीकडून कौलखेड जहाॅगीर येथील ३८० शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा फरकाची ९५ लाख ६९ हजार ७०० रुपयांची रक्कम ११ फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात आ. रणधीर सावरकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून, पीक विमा फरकाच्या रकमेपासून वंचित असलेल्या कौलखेड जहाॅगीर येथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.