शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

जिल्ह्यातील पिकांची वाढ जोमदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:42 IST

अकोला : जुलै महिन्यात आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागातील पिकांना जीवदान मिळाले असून, सोयाबीन, मूग, उडीद व भुईमूग पिकांची जोरदार वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे२५ जुलैपर्यंत पेरणी: अल्प पावसाने काही भागाला तारले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुलै महिन्यात आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागातील पिकांना जीवदान मिळाले असून, सोयाबीन, मूग, उडीद व भुईमूग पिकांची जोरदार वाढ झाली आहे.जिल्ह्यातील १० टक्के शेतकºयांनी जून महिन्यात पेरणी केली होती. त्यातील बहुतांश शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. क्वचित भागात पाण्याच्या सरी येऊन गेल्याने तेथील पिके तग धरू न होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला. त्यानंतर पेरणीला वेग आला होता. तथापि, पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकºयांनी पेरण्या थांबविल्या होत्या; पण अधून-मधून काही भागात तुरळक सरी कोसळल्या. त्या भागातील पिकांना दिलासा मिळाला होता. १५ जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केल.त्यानंतर १५ ते २७ जुलैपर्यंत पेरण्या सुरू होत्या. १५ जुलैनंतर तुरळक पाऊस सुरू असल्याने ही पिके अंकुरली आहेत. त्या अगोदरची पिके ज्यांना काही प्रमाणात पाणी मिळाले, ती पिके बहरली असून, त्या पिकांना दोन डवºयाचे फेरही देण्यात आले आहेत. जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन पिकाचे क्षेत्र घटण्याचे संकेत होते; परंतु पाऊसच नसल्याने शेतकºयांनी सोयाबीन पेरणी केली आहे. त्या खालोखाल कापूस पीक असून, तूर, मूग, उडीद काही प्रमाणात आजही तग धरू न आहे; परंतु मूग, उडिदाला फुलोरा किती, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. जुलै महिन्यातील पावसामुळे या पिकांची वाढ चांगली झाली आहे, तसेच खरीप भुईमूग पीकही काही भागात जोरात आले आहे. ज्वारीचा पेरा मात्र मर्यादित आहे. २५ जुलैनंतर पेरणी केलेली पिके अद्याप वर निघाली नाहीत.दरम्यान, दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस कमी झाला असून, तीन, चार ठिकाणी अत्यंत तुरळक पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.