शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पिके हातून गेली, पण पैसेवारी ५0 पैशांवर!

By admin | Updated: October 3, 2015 02:39 IST

प्रशासनाचा नजरअंदाज अवास्तव: शेतकरी हवालदिल.

अकोला: अत्यल्प पावसामुळे मूग व उडिदाचे पीक हातून गेले, सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला; मात्र जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या नरजअंदाज पैसेवारीत केवळ ५५ गावांची पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी असून, जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रशासनमार्फत काढण्यात आलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नजरअंदाज अवास्तव पैसेवारीबाबत शेतकर्‍यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसाने दांडी मारल्याने खरीप पेरण्या लांबल्या. तसेच अत्यल्प पाऊस झाल्याने, मूग पिकाचे उत्पादन सरासरी एकरी २0 ते २५ किलो झाले असून, उडिदाचे पीक बुडाले. अनेक ठिकाणी मूग व उडीद पिकाची वखरणी करावी लागली. त्यामुळे या पिकांच्या पेरणीसाठी केलेला खर्च भरून काढणारे उत्पादनही मिळाले नसल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. सोयाबीन पिकाचे उत्पादन एकरी सरासरी २ ते ३ क्विंटल झाल्याने, या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. तसेच कपाशी पिकाची स्थितीही वाईट असून, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पिकाच्या उत्पादनात ५0 ते ६0 टक्क्यांची घट होण्याची शक्यता शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. मूग व उडीद पिकांचे उत्पादन बुडाले असून, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे. खरीप हंगामातील हातून गेलेली पिके उत्पादनात प्रचंड घट झाली असतानाच, ३0 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांकडून जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नजर पैसेवारीनुसार मात्र जिल्ह्यातील लागवडीयोग्य एकूण ९९७ गावांपैकी केवळ ५५ गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी असून, उर्वरित ९४२ गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त आहे. हातून गेलेली पिके आणि पिकांच्या उत्पादनात झालेली प्रचंड घट बघता, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या नरजअंदाज पैसेवारीवर शेतकर्‍यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.