शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

पिके हातून गेली, पण पैसेवारी ५0 पैशांवर!

By admin | Updated: October 3, 2015 02:39 IST

प्रशासनाचा नजरअंदाज अवास्तव: शेतकरी हवालदिल.

अकोला: अत्यल्प पावसामुळे मूग व उडिदाचे पीक हातून गेले, सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला; मात्र जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या नरजअंदाज पैसेवारीत केवळ ५५ गावांची पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी असून, जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रशासनमार्फत काढण्यात आलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नजरअंदाज अवास्तव पैसेवारीबाबत शेतकर्‍यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसाने दांडी मारल्याने खरीप पेरण्या लांबल्या. तसेच अत्यल्प पाऊस झाल्याने, मूग पिकाचे उत्पादन सरासरी एकरी २0 ते २५ किलो झाले असून, उडिदाचे पीक बुडाले. अनेक ठिकाणी मूग व उडीद पिकाची वखरणी करावी लागली. त्यामुळे या पिकांच्या पेरणीसाठी केलेला खर्च भरून काढणारे उत्पादनही मिळाले नसल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. सोयाबीन पिकाचे उत्पादन एकरी सरासरी २ ते ३ क्विंटल झाल्याने, या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. तसेच कपाशी पिकाची स्थितीही वाईट असून, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पिकाच्या उत्पादनात ५0 ते ६0 टक्क्यांची घट होण्याची शक्यता शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. मूग व उडीद पिकांचे उत्पादन बुडाले असून, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे. खरीप हंगामातील हातून गेलेली पिके उत्पादनात प्रचंड घट झाली असतानाच, ३0 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांकडून जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नजर पैसेवारीनुसार मात्र जिल्ह्यातील लागवडीयोग्य एकूण ९९७ गावांपैकी केवळ ५५ गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी असून, उर्वरित ९४२ गावांमधील खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा जास्त आहे. हातून गेलेली पिके आणि पिकांच्या उत्पादनात झालेली प्रचंड घट बघता, जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या नरजअंदाज पैसेवारीवर शेतकर्‍यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.