शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

उमरा परिसरात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST

यावर्षी पावसाने सुरुवातीला दमदार आगमन करून शेतकरी मान्सूनपूर्व पावसाने संकटात सापडला आहे. ६ जूनला पावसाने हजेरी लावल्याने ...

यावर्षी पावसाने सुरुवातीला दमदार आगमन करून शेतकरी मान्सूनपूर्व पावसाने संकटात सापडला आहे. ६ जूनला पावसाने हजेरी लावल्याने उमरा परिसरात नियमित पाऊस पडल्याने उमरा परिसरातील शेतकऱ्यांनी १० जूनपासून पेरणी करण्यास सुरुवात केली. बैलजोडी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने जवळपास ७० टक्के पेरणी आटोपली. सोयाबीन व कपाशी, तूर, उडीद, मूग, ज्वारी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना आधीच बियाणे मिळविण्यासाठी आर्थिक जुळवाजुळवी करावी लागली. कृषी विभागाने तूर्त पेरण्या करू नका असा सल्ला दिल्यानंतरही उमरा परिसरात अनेकांनी कोरडवाहू पेरणी केल्या. नंतर बियाणे अंकुरले; मात्र वाढत्या तापमानामुळे अंकुरलेले बियाणे जागेवरच कुजत आहेत. मात्र, आता ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची व्यवस्था आहे. त्यांना पुरेशी वीज मिळत नाही. यामुळे सिंचनही रखडले आहे. यातून शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. आधीच लाॅकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून यंदा खरीप हंगामाची नव्या जोमाने तयारी केली. मात्र, पेरणी केल्यानंतर एक आठवड्यापासून पाऊस नाही. त्यामुळे अंकुरलेले बियाणे करपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

फोटो:

सुरुवातीला चांगला पाऊस आल्यामुळे पेरणी केली. पेरणी केल्यानंतर बियाणे अंकुरले; मात्र आता पावसाने दांडी मारल्याने अंकुरलेले बियाणे कुजत आहेत.

- विजयसिंह तोमर, शेतकरी उमरा