शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

अवैध गौण खनिजप्रकरणी फौजदारी कारवाई होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

विजय शिंदे अकोटः जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक वाढली आहे. त्यामुळे लाखोंचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ...

विजय शिंदे

अकोटः जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक वाढली आहे. त्यामुळे लाखोंचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दि.२३ सप्टेंबर रोजी आदेश काढून जिल्ह्यातील सर्व क्रेशरधारक व खदानधारकांनी गौणखनिज नियमांनुसार राॅयल्टी वाहतूक पासेससोबत ठेवावी, क्रेशरधारकांनी साठा परवाना बाळगणे आवश्यक असणार आहे, तसेच अनधिकृत गौणखनिज उत्खनन होत असल्यास अन्यथा त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, शिवाय फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

येथे तपासणी नाका झाल्यानंतरही विविध नियमांच्या पळवाटा काढीत विनाराॅयल्टी वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी नव्याने कारवाईचा आदेश काढला आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांनी आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत.

--------------------------

जिल्ह्यात मोक्याच्या ठिकाणी १३ तपासणी नाके!

जिल्ह्यात मोक्याच्या ठिकाणी १३ तपासणी नाका सुरू करून स्थायी पथकाची २४ तास रोटेशन पद्धतीने तालुका व उपविभागीय यांच्या स्तरावर तपासणी नाका पथक नियुक्त करण्यात आले आहे. या तपासणी नाक्यावर पथकातील कोणीही गैरहजर राहू नये, असे आदेशात म्हटले आहे. शिवाय तालुक्यात एक फिरते पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गौणखनिज वाहतुकीची वाहने तपासणीसाठी तैनात असताना वाहतूक करणाऱ्या व्यक्तीजवळ राॅयल्टी किंवा फिनिश मटेरियल असल्याशिवाय कोणतेही वाहन सोडण्यात येऊ नये, असे आदेश पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

----------------------------

पोलीस, महसूल, ग्रामविकास विभागाची संयुक्त जबाबदारी

गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालणे, केवळ महसूल विभागाची जबाबदारी नसल्याने पोलीस विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग यांची संयुक्त जबाबदारी आहे. कारवाई करताना पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, संबंधित गावचे ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य घ्यावे, असे आदेशात नमूद आहे.

---------------------------------------

शासकीय कर्मचाऱ्यांसह ग्रा.पं. सदस्यांनाही व्हावे लागणार पायउतार!

बऱ्याच ठिकाणी स्थानिकांच्या सहकार्याने गौणखनिज, रेतीची अवैध वाहतूक होते, अशाप्रसंगी शासकीय कर्मचारी, पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गावचे पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांवरसुद्धा कार्यवाही प्रस्तावित करावी, असे आदेशात नमूद आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायत सदस्यांवर अशा प्रकारची फिर्याद दाखल केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यास पदावरून हटविण्याबाबत प्रस्ताव दाखल करावा, असेही नमूद केले आहे.