शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

व्यापारी आत्महत्येप्रकरणी रिसोडच्या मुख्याधिका-यांसह चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 01:26 IST

कल्पेश वर्माच्या आत्महत्या प्रकरणास तीन दिवसांनंतर कलाटणी; नगरसेविकेवरही फौजदारी.

रिसोड (वाशिम) : येथील व्यापारी युवक कल्पेश वर्माच्या आत्महत्या प्रकरणास तीन दिवसांनंतर कलाटणी मिळाली आहे. भूखंडाच्या व्यवहारातून आत्महत्या करणार्‍या कल्पेशला षडयंत्र रचून त्रास दिल्याप्रकरणी रिसोड नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर झाडे, तसेच नगरसेविका मीना अग्रवाल यांच्यासह चार जणांविरूद्ध रिसोड पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. कल्पेशचा भाऊ गोविंद वर्मा यांनी रिसोड पोलीस ठाण्याला यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार, सुनील रामकृष्ण बगडीया यांनी २00४-0५मध्ये रिसोड येथे केलेल्या एका जमिनीच्या खरेदीमध्ये कल्पेश वर्मा हा भागीदार होता. हा व्यवहार एकूण पाच प्लॉटचा होता. त्यापैकी दोन प्लॉट सुनील बगडीया आणि त्यांच्या भावाच्या नावाने, तर इतर तीन प्लॉट ताराचंद वर्मा व त्यांच्या कुटुंबातील अन्य दोन सदस्यांच्या नावावर होते. वाशिमच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून १ सप्टेंबर २0१५ रोजी ताराचंद वर्मा यांना भाडेपट्टयावर प्लॉट मिळाला. मध्यंतरीच्या काळात सुनील बगडियानी त्यापैकी अर्धा प्लॉट त्याला मिळावा, यासाठी ताराचंद वर्मा यांच्याकडे तगादा लावला. त्यांनी नकार दिल्यानंतर बगडीया यांनी नगरसेविका मीना अग्रवाल, त्यांचे पती अशोक अग्रवाल यांना हाताशी धरून वर्मा यांना त्रास देणे सुरू केले. नंतर रिसोड पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांना हाताशी धरून वर्मा कुटुंबाच्या सामुहिक मालकीचे बांधकाम पाडण्याची नोटीस १८ मार्च २0१६ रोजी बजावण्यात आली. या नोटिशीवर वर्मा यांनी न्यायालयाकडून मनाई हुकूम आणू नये, यासाठी त्यांनी रिसोड व वाशिममध्ये कॅव्हेटही दाखल केले. तेव्हापासून आमचे कुटुंब तणावाखाली होते, असे फिर्यादीत वर्मा यांनी नमूद केले. ताराचंद वर्मा यांचा मुलगा कल्पेश हा जास्तच तणावाखाली होता. त्यातूनच त्याने ७ एप्रिल रोजी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अशोक अग्रवाल आणि इतर तिघांच्या त्रासाचा उल्लेख केला होता. त्यानंतर कल्पेशच्या आत्महत्येस मीना अग्रवाल, त्यांचे पती अशोक, सुनील बगडीया आणि सुधाकर पानझडे हे कारणीभूत असल्याची तक्रार गोविंद वर्मा यांनी पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून रिसोड पोलिसांनी चौघांविरूद्ध भादंविचे कलम ३0६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.