शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करा - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 16:22 IST

राज्यात अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

अकोला : शाश्वत पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. दुष्काळमुक्तीसाठी लोकांच्या सहकार्याने पाणी फाउडेंशनने सुरु केलेली सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा आपल्या जिल्हयाचा कायापालट करणारी ठरली आहे. यंदाही या स्पर्धेत जास्तीतजास्त लोकांनी सहभागी होऊन राज्यात अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.पाणी फाउडेंशन सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा-4 सन -2019 बाबत नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, पाणी फाउडेंशनचे जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड आदींसह सरपंच, तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील उपस्थित होते.अकोला जिल्हयात सन 2017 पासून वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सन 2019 या वर्षाकरीता बार्शिटाकळी, तेल्हारा, पातूर व अकोट या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून स्पर्धा सुरु होणार आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत शालेय व महाविदयालयनी विदयार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.पालकमंत्री म्हणाले की, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांनी जलयुक्त शिवार हा उपक्रम सुरु केला. यामुळे मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे होऊन पाणी साठे निर्माण झाले. तर पाणी फाउडेंशनने जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देऊन राज्यात एक नवी लोकचळवळ निर्माण केली. सर्व भेद विसरुन लोक एकत्र आले. गावागावांमध्ये जलसंधारणाची अनेक कामे होऊन त्यामध्ये पाणी खेळू लागले. अकोला जिल्हयातही वॉटरकप स्पर्धेसाठी लोकांचा चांगला सहभाग मिळत आहे. पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले गाव पाणीदार करावे. या उपक्रमामध्ये मनरेगाला जोडण्याचा निश्चित प्रयत्न राहिल. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे म्हणाल्या की, प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वॉटरकप स्पर्धेत सहभागी व्हावे. आपल्या गावाला पाणी टंचाईपासून मुक्त करणाऱ्या या उपक्रमात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. काकड यांनी प्रास्तविक केले. संचालन व आभारप्रदर्शन बार्शिटाकळी तालुक्याचे समन्वयक संघपाल वाहुरवाळ यांनी केले.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील