शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करा - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 16:22 IST

राज्यात अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

अकोला : शाश्वत पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. दुष्काळमुक्तीसाठी लोकांच्या सहकार्याने पाणी फाउडेंशनने सुरु केलेली सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा आपल्या जिल्हयाचा कायापालट करणारी ठरली आहे. यंदाही या स्पर्धेत जास्तीतजास्त लोकांनी सहभागी होऊन राज्यात अकोला जिल्हयाची पाणीदार जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.पाणी फाउडेंशन सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा-4 सन -2019 बाबत नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, पाणी फाउडेंशनचे जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड आदींसह सरपंच, तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील उपस्थित होते.अकोला जिल्हयात सन 2017 पासून वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सन 2019 या वर्षाकरीता बार्शिटाकळी, तेल्हारा, पातूर व अकोट या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून स्पर्धा सुरु होणार आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत शालेय व महाविदयालयनी विदयार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.पालकमंत्री म्हणाले की, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांनी जलयुक्त शिवार हा उपक्रम सुरु केला. यामुळे मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे होऊन पाणी साठे निर्माण झाले. तर पाणी फाउडेंशनने जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देऊन राज्यात एक नवी लोकचळवळ निर्माण केली. सर्व भेद विसरुन लोक एकत्र आले. गावागावांमध्ये जलसंधारणाची अनेक कामे होऊन त्यामध्ये पाणी खेळू लागले. अकोला जिल्हयातही वॉटरकप स्पर्धेसाठी लोकांचा चांगला सहभाग मिळत आहे. पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले गाव पाणीदार करावे. या उपक्रमामध्ये मनरेगाला जोडण्याचा निश्चित प्रयत्न राहिल. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे म्हणाल्या की, प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वॉटरकप स्पर्धेत सहभागी व्हावे. आपल्या गावाला पाणी टंचाईपासून मुक्त करणाऱ्या या उपक्रमात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. काकड यांनी प्रास्तविक केले. संचालन व आभारप्रदर्शन बार्शिटाकळी तालुक्याचे समन्वयक संघपाल वाहुरवाळ यांनी केले.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील