शहरं
Join us  
Trending Stories
1
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
2
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
3
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
4
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
5
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
6
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
7
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
8
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
9
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
10
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
11
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
12
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
13
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
14
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
15
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
16
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
17
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
18
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
19
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
20
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!

डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये हाणामारी

By admin | Updated: April 3, 2015 02:31 IST

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटना; परस्परांविरुद्ध तक्रारी, डॉक्टरांची पोलिसांविरोधात नारेबाजी.

अकोला- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाचे नातेवाईक व वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे प्रशिक्षु डॉक्टरांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी रात्री ११ पासून तर मध्यरात्री २ पर्यंत हा प्रकार सुरू होता. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या. गांधीग्राम येथील रहिवासी प्रकाश महादेव अढाऊ गुरुवारी रात्री एका अँपेमध्ये घराकडे जात असताना त्यांच्या वाहनाला भरधाव जाणार्‍या एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे प्रकाश अढाऊ यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टर उपचार करण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत अढाऊ यांच्या नातेवाइकांनी डॉ. वैशाली रामदास माटे या विद्यार्थिनीस मारहाण केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही डॉक्टरांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, अढाऊ यांचे नातेवाईक व काही प्रशिक्षु डॉक्टरांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये डॉ. शशिकांत मेडशीकर, डॉ. वैशाली माटे, डॉ. जुगल, डॉ. नवीन गायधने, डॉ. दळवी यांच्यासह आणखी काही विद्यार्थी जखमी झाले, तर डॉक्टरांनीही अढाऊ यांच्या नातेवाईकांना मारहाण केल्याने प्रकाश अढाऊ यांची मुलगी, एक वृद्ध आणि आणखी चार जण जखमी झाले. डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना मिळताच तब्बल २00 ते २५0 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन रुग्णाच्या नातेवाइकांवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिरुद्ध अढाऊ हे पोलीस ताफ्यासह सवरेपचार रुग्णालयात दाखल झाले. विद्यार्थ्यांनी पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी करीत रुग्णाच्या नातेवाइकांवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी वैशाली माटे हिने दिलेल्या तक्रारीवरून अढाऊ कुटुंबीयांविरुद्ध, तर अढाउ यांच्या तक्रारीवरून वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.