शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

‘जीआयएस’द्वारे मोजणी : अकोला पॅटर्न राज्यात!

By admin | Updated: May 17, 2017 02:03 IST

‘ड’ वर्ग मनपा, ‘क’ वर्ग नगर परिषदांमध्ये होणार जीआयएसद्वारे पुनर्मूल्यांकन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिका क्षेत्रात मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ‘जीआयएस’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. स्थापत्य कंन्सलटन्सीच्या सर्व्हेद्वारे मालमत्तांचे अचूक मोजमाप करण्यात आले. यामुळे मनपाच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असल्याचे समोर येताच अकोल्यातील ‘जीआयएस’ पॅटर्न राज्यभरात लागू करण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे प्रत्येक चार वर्षांनंतर पुनर्मूल्यांकन होणे अपेक्षित आहे. मागील १९ वर्षांपासून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकनच झाले नाही. त्यामुळे मालमत्तांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच ज्या मालमत्ताधारकांनी घरी अतिरिक्त बांधकाम केले त्यांचा शोध घेऊन त्याला नवीन कर लागू करण्यासाठी मनपाने ‘जीआयएस’ प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. स्थापत्य कन्सलटन्सीला सर्वेक्षणाचा कंत्राट देण्यात आला. घर, इमारतींचे सुस्पष्ट छायाचित्र मिळावे, यासाठी कंपनीने ड्रोनचा वापर केला. नवीन प्रभाग वगळून शहरातील मालमत्तांची आकडेवारी १ लाख ५ हजारपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले. एरव्ही १६ ते १८ कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्याचे मनपाचे उद्दिष्ट होते. पुनर्मूल्यांकनानंतर किमान ६८ ते ७० कोटींपर्यंत वाढ होणार आहे. यासंदर्भात नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठक आयोजित केली असता मनपाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले होते. हीच पद्धत राज्यातील इतर महापालिकांना लागू केल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे शासनाच्या लक्षात आले. मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकोल्यातील ‘जीआयएस’ तंत्रज्ञानावर आधारित मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिका, ‘क’ वर्ग नगर परिषद, नगरपालिकांमध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘जीआयएस’मुळे अचूकता!‘जीआयएस’प्रणालीद्वारे मालमत्तांच्या सर्वेक्षणात अचूकता येते. त्यानंतर कर्मचाऱ्यांमार्फत मालमत्तांची मोजणी केली जाते. यामुळे जुन्या घराचे किंवा इमारतीचे क्षेत्रफळ किती आणि त्यामध्ये नवीन बांधकाम किती, हे उघड होते. शासनाने अकोल्यातील ‘जीआयएस’ पॅटर्न राज्यभरात लागू करावा, ही महापालिकेसाठी भूषणावह बाब आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सहकार्यामुळे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन शक्य झाले. यामुळे मनपाच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांमध्ये आर्थिक हिस्सा जमा होण्याचा मार्ग खुला झाला आहे. - अजय लहाने, आयुक्त, मनपा