शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कापसाचा वेचा संपला, तुरीचा फुलोरा गळाला!

By admin | Updated: November 29, 2014 22:34 IST

व-हाडात दुष्काळाच्या झळा तीव्र.

अकोला: साधारणत: मार्च अखेरपर्यंत चालणारी कापसाची वेचणी यावर्षी डिसेंबरपूर्वीच जवळपास संपुष्टात आली असून, तुरीच्या फुलोरालाही गळती लागली आहे. यावर्षी पावसाचे आगमन लांबल्याने, मूग, उडीद आदी कमी कालावधीच्या पिकांचा फारसा पेराच झाला नाही, तर गत काही वर्षांपासून प्रमुख पीक म्हणून कापसाची जागा घेतलेल्या सोयाबीनची पावसाच्या लहरीपणामुळे पुरती धुळधाण झाली. या पृष्ठभूमीवर वर्‍हाडात दुष्काळाच्या झळा आतापासूनच तीव्र झाल्या आहेत. वर्‍हाडात दर एक-दोन वषार्ंनंतर दुष्काळसदृश स्थिती निर्माण होत असल्याने या विभागातील सरासरी शेतमाल उत्पादन घटले आहे. यावर्षी पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस या नगदी पिकाला तर जबर फटका बसला आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कापसाचे उत्पादन घेतले जाते; पंरतु यावर्षी डिसेंबर महिना सुरू होण्यापूर्वीच, हजारो हेक्टरवरील कापसाचा वेचा संपला आहे आणि त्यातच तुरीच्या फुलोर्‍यालाही गळती लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जमिनीतील ओलावा संपल्याने शेताला भेगा पडल्या आहेत. परिणामी शेतातील ओलावा पूर्णत: नष्ट झाला आहे. कोरडवाहू , हलक्या जमिनीतील कापसाच्या झाडांना तर दहा बोंडेसुध्दा शिल्लक नाहीत. शिल्लक दहा बोंडातील पाच बोंड्या वाळल्या असून, त्यांचे वाळलेल्या कवडयात रू पांतर झाले आहे. भारी काळ्या जमिनीतील बीटी कापसाच्या झाडांनादेखील दहापेक्षा जास्त बोेंड्या नसल्याचे चित्र आहे. थंडी व सकाळी पडणार्‍या दवामुळे ओलावा निर्माण होवून, कापसाची बोंडे फुलण्यास मदत होते; तथापि यावर्षी थंडी नाही आणि त्यामुळे दवदेखील पडत नसल्याने, कापूस उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. परिणामी कापसाची वेचणी यावर्षी नोव्हेंबरमध्यचे आटोपल्याचे चित्र आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांनी वर्‍हाडातील हे चित्र इतर प्रदेशापेक्षा भीषण असल्याचे म्हटले आहे. लोकमतशी बोलताना ते म्हणाले की त्यांनी वर्धा व यवतमाळ या दोन जिल्हय़ांचा स्वत: दौरा केला असून, त्या भागातील कापसाचे चित्र विदारक आहे. जमिनीतील ओलावा संपल्याने कापूस पीक शेवटची घटका मोजत असून, कापसाच्या शेतांची नोव्हेंबर महिन्यातच उलंगवाडी सुरू झाली आहे.