शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचा वेचा संपला, तुरीचा फुलोरा गळाला!

By admin | Updated: November 29, 2014 22:34 IST

व-हाडात दुष्काळाच्या झळा तीव्र.

अकोला: साधारणत: मार्च अखेरपर्यंत चालणारी कापसाची वेचणी यावर्षी डिसेंबरपूर्वीच जवळपास संपुष्टात आली असून, तुरीच्या फुलोरालाही गळती लागली आहे. यावर्षी पावसाचे आगमन लांबल्याने, मूग, उडीद आदी कमी कालावधीच्या पिकांचा फारसा पेराच झाला नाही, तर गत काही वर्षांपासून प्रमुख पीक म्हणून कापसाची जागा घेतलेल्या सोयाबीनची पावसाच्या लहरीपणामुळे पुरती धुळधाण झाली. या पृष्ठभूमीवर वर्‍हाडात दुष्काळाच्या झळा आतापासूनच तीव्र झाल्या आहेत. वर्‍हाडात दर एक-दोन वषार्ंनंतर दुष्काळसदृश स्थिती निर्माण होत असल्याने या विभागातील सरासरी शेतमाल उत्पादन घटले आहे. यावर्षी पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस या नगदी पिकाला तर जबर फटका बसला आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कापसाचे उत्पादन घेतले जाते; पंरतु यावर्षी डिसेंबर महिना सुरू होण्यापूर्वीच, हजारो हेक्टरवरील कापसाचा वेचा संपला आहे आणि त्यातच तुरीच्या फुलोर्‍यालाही गळती लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जमिनीतील ओलावा संपल्याने शेताला भेगा पडल्या आहेत. परिणामी शेतातील ओलावा पूर्णत: नष्ट झाला आहे. कोरडवाहू , हलक्या जमिनीतील कापसाच्या झाडांना तर दहा बोंडेसुध्दा शिल्लक नाहीत. शिल्लक दहा बोंडातील पाच बोंड्या वाळल्या असून, त्यांचे वाळलेल्या कवडयात रू पांतर झाले आहे. भारी काळ्या जमिनीतील बीटी कापसाच्या झाडांनादेखील दहापेक्षा जास्त बोेंड्या नसल्याचे चित्र आहे. थंडी व सकाळी पडणार्‍या दवामुळे ओलावा निर्माण होवून, कापसाची बोंडे फुलण्यास मदत होते; तथापि यावर्षी थंडी नाही आणि त्यामुळे दवदेखील पडत नसल्याने, कापूस उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. परिणामी कापसाची वेचणी यावर्षी नोव्हेंबरमध्यचे आटोपल्याचे चित्र आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांनी वर्‍हाडातील हे चित्र इतर प्रदेशापेक्षा भीषण असल्याचे म्हटले आहे. लोकमतशी बोलताना ते म्हणाले की त्यांनी वर्धा व यवतमाळ या दोन जिल्हय़ांचा स्वत: दौरा केला असून, त्या भागातील कापसाचे चित्र विदारक आहे. जमिनीतील ओलावा संपल्याने कापूस पीक शेवटची घटका मोजत असून, कापसाच्या शेतांची नोव्हेंबर महिन्यातच उलंगवाडी सुरू झाली आहे.