शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

तेल्हारा तालुक्यात कपाशी, सोयाबीनचा पेरा वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:26 IST

तेल्हारा : तालुक्यात यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावली असल्याने काही बागायती व कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. आता मात्र ...

तेल्हारा : तालुक्यात यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावली असल्याने काही बागायती व कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. आता मात्र पावसाने दांडी मारली असून, ऊन तापत असल्यामुळे शेतकरी चिंतित दिसत आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार तेल्हारा तालुक्यात यंदा कपाशी, सोयाबीन पिकाचा पेरा वाढणार आहे.

गतवर्षी सुरुवातीला पाऊस कमी पडल्यामुळे तसेच रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता. यासोबतच कपाशीवरसुद्धा बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट झाली होती. गतवर्षी सुरुवातीला मूग, उडीद व सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन, कपाशी पिकाकडे वळणार नाहीत, असा कयास होता. परंतु कृषी विभागाच्या अंदाजानुसार तेल्हारा तालुक्यात २३ हजार हेक्टर कपाशी आणि १८ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यावर्षी पाऊस लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे पावसाने हजेरीसुद्धा लावली. बागायती शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था असल्याने पेरणी केली. मात्र सोबतच कोरडवाहू शेतकऱ्यांनीसुद्धा बऱ्याच प्रमाणात पेरणी केली. काहींच्या पेरण्या आटोपल्या. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कडक ऊन तापत आहे. त्यामुळे काहींनी पेरणी थांबविली. मात्र ज्यांनी पेरणी केली व त्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही. अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता सतावत आहे.

फोटो:

पेरणीकरिता किमान १०० मिमी पावसाची आवश्यकता असून, केवळ ४० मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून, तालुक्यात ६ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सोयाबीनची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येऊ शकते.

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

तेल्हारा तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

तालुक्यात २३ हजार हेक्टरवर कपाशी, तर १८ हजार हेक्टरवर सोयाबीन आणि सात हजार हेक्टरवर तूर, पाच हजार हेक्टरवर मूग, उडदाची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात असून, तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटणार असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचे दिसून येत आहे.