शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुक्यात कपाशी, सोयाबीनचा पेरा वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:26 IST

तेल्हारा : तालुक्यात यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावली असल्याने काही बागायती व कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. आता मात्र ...

तेल्हारा : तालुक्यात यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावली असल्याने काही बागायती व कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. आता मात्र पावसाने दांडी मारली असून, ऊन तापत असल्यामुळे शेतकरी चिंतित दिसत आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार तेल्हारा तालुक्यात यंदा कपाशी, सोयाबीन पिकाचा पेरा वाढणार आहे.

गतवर्षी सुरुवातीला पाऊस कमी पडल्यामुळे तसेच रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता. यासोबतच कपाशीवरसुद्धा बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट झाली होती. गतवर्षी सुरुवातीला मूग, उडीद व सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन, कपाशी पिकाकडे वळणार नाहीत, असा कयास होता. परंतु कृषी विभागाच्या अंदाजानुसार तेल्हारा तालुक्यात २३ हजार हेक्टर कपाशी आणि १८ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यावर्षी पाऊस लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे पावसाने हजेरीसुद्धा लावली. बागायती शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था असल्याने पेरणी केली. मात्र सोबतच कोरडवाहू शेतकऱ्यांनीसुद्धा बऱ्याच प्रमाणात पेरणी केली. काहींच्या पेरण्या आटोपल्या. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कडक ऊन तापत आहे. त्यामुळे काहींनी पेरणी थांबविली. मात्र ज्यांनी पेरणी केली व त्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही. अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता सतावत आहे.

फोटो:

पेरणीकरिता किमान १०० मिमी पावसाची आवश्यकता असून, केवळ ४० मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून, तालुक्यात ६ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सोयाबीनची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येऊ शकते.

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

तेल्हारा तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

तालुक्यात २३ हजार हेक्टरवर कपाशी, तर १८ हजार हेक्टरवर सोयाबीन आणि सात हजार हेक्टरवर तूर, पाच हजार हेक्टरवर मूग, उडदाची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात असून, तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटणार असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचे दिसून येत आहे.