शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

तेल्हारा तालुक्यात कपाशी, सोयाबीनचा पेरा वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:26 IST

तेल्हारा : तालुक्यात यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावली असल्याने काही बागायती व कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. आता मात्र ...

तेल्हारा : तालुक्यात यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावली असल्याने काही बागायती व कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. आता मात्र पावसाने दांडी मारली असून, ऊन तापत असल्यामुळे शेतकरी चिंतित दिसत आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार तेल्हारा तालुक्यात यंदा कपाशी, सोयाबीन पिकाचा पेरा वाढणार आहे.

गतवर्षी सुरुवातीला पाऊस कमी पडल्यामुळे तसेच रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता. यासोबतच कपाशीवरसुद्धा बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट झाली होती. गतवर्षी सुरुवातीला मूग, उडीद व सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन, कपाशी पिकाकडे वळणार नाहीत, असा कयास होता. परंतु कृषी विभागाच्या अंदाजानुसार तेल्हारा तालुक्यात २३ हजार हेक्टर कपाशी आणि १८ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यावर्षी पाऊस लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे पावसाने हजेरीसुद्धा लावली. बागायती शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था असल्याने पेरणी केली. मात्र सोबतच कोरडवाहू शेतकऱ्यांनीसुद्धा बऱ्याच प्रमाणात पेरणी केली. काहींच्या पेरण्या आटोपल्या. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कडक ऊन तापत आहे. त्यामुळे काहींनी पेरणी थांबविली. मात्र ज्यांनी पेरणी केली व त्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही. अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता सतावत आहे.

फोटो:

पेरणीकरिता किमान १०० मिमी पावसाची आवश्यकता असून, केवळ ४० मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून, तालुक्यात ६ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सोयाबीनची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येऊ शकते.

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

तेल्हारा तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

तालुक्यात २३ हजार हेक्टरवर कपाशी, तर १८ हजार हेक्टरवर सोयाबीन आणि सात हजार हेक्टरवर तूर, पाच हजार हेक्टरवर मूग, उडदाची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात असून, तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटणार असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचे दिसून येत आहे.