शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

कापसाचे उत्पादन पोहोचणार ९0 लाख गाठींपर्यंत

By admin | Updated: January 9, 2015 01:20 IST

तज्ज्ञांचा अंदाज, संक्रांतीनंतर वाढेल आवक.

अकोला : राज्यात ८५ लाख कापूस गाठींचे उत्पादन अपेक्षित होते; परंतु अवकाळी पावसामुळे या उत्पादनात आठ ते दहा टक्के वाढ होऊन, हे उत्पादन ९0 लाख गाठीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संक्रांतीनंतर बाजारात कापसाची आवक वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. गत खरीप हंगामात राज्यात ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी करण्यात आली होती. विदर्भात १७ लाख हेक्टरच्यावर कापसाचे क्षेत्र आहे; पण खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस उत्पादनाला फटका बसला आहे. असे असले तरी ८५ लाख कापूस गाठी उत्पादन अपेक्षित धरण्यात आले आहे. गत आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्या आठवड्यात अकोला जिल्हय़ात एकाच दिवशी ५0 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. अवकाळी पावसामुळे कापूस झांडाना पुन्हा जीवदान मिळाले असून, अनेक ठिकाणी हे पीक पुन्हा फुलोर्‍यावर येत आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून, कापसाचे उत्पादन आठ ते दहा टक्कय़ांनी वाढण्याची शक्यता आहे.राज्यात शनिवारपर्यंत ६१ लाख क्विंटल कापूस शेतकर्‍यांनी विकला असून, यातील २६ लाख क्विंटल कापूस भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी केला आहे; पण सीसीआय आणि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे कापूस दर प्रतवारीच्या निकषावर ठरले असल्याने शेतकर्‍यांना हमी दरापेक्षा प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रुपये कमी दर दिले जात आहेत. परिणामी शेतकर्‍यांचा ओढा खासगी बाजाराकडे आहे. असे असले तरी कापसाचे दर वाढतील, या अपेक्षेवर सधन शेतकर्‍यांनी अद्याप कापूस विकण्यासाठी काढलेला नाही. आतापर्यंत बाजारात जो कापूस विकण्यात आला आहे, तो मुख्यत्वे अल्पभूधारक शेतकर्‍यांचा आहे. संक्रांतीनंतर मात्र बाजारपेठेत कापसाची आवक वाढण्याची शक्यता आहे. फरदडीला कापूस येतोच. आता फुलोरा आला असेल, तर शेतकर्‍यांना त्यासाठी रसशोषण किडी, मावा आदीबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. अन्नद्रव्यासाठी डीएपी, युरियाची फवारणी करणे क्रमप्राप्त असल्याचे जेष्ठ कापूस संशोधक डॉ. आदीनाथ पसलावार यांनी स्पष्ट केले. *फरदडीला कापूस येतो२0१२-१३ मध्ये अवकाळी पाऊस आल्यानंतर, त्यावर्षी फरदडपासून शेतकर्‍यांना दोन ते तीन क्विंटल कापसाचे उत्पादन वाढले होते. यावर्षीदेखील अवकाळी पाऊस झाल्याने, उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.