शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे उत्पादन पोहोचणार ९0 लाख गाठींपर्यंत

By admin | Updated: January 9, 2015 01:20 IST

तज्ज्ञांचा अंदाज, संक्रांतीनंतर वाढेल आवक.

अकोला : राज्यात ८५ लाख कापूस गाठींचे उत्पादन अपेक्षित होते; परंतु अवकाळी पावसामुळे या उत्पादनात आठ ते दहा टक्के वाढ होऊन, हे उत्पादन ९0 लाख गाठीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संक्रांतीनंतर बाजारात कापसाची आवक वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. गत खरीप हंगामात राज्यात ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी करण्यात आली होती. विदर्भात १७ लाख हेक्टरच्यावर कापसाचे क्षेत्र आहे; पण खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस उत्पादनाला फटका बसला आहे. असे असले तरी ८५ लाख कापूस गाठी उत्पादन अपेक्षित धरण्यात आले आहे. गत आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्या आठवड्यात अकोला जिल्हय़ात एकाच दिवशी ५0 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. अवकाळी पावसामुळे कापूस झांडाना पुन्हा जीवदान मिळाले असून, अनेक ठिकाणी हे पीक पुन्हा फुलोर्‍यावर येत आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून, कापसाचे उत्पादन आठ ते दहा टक्कय़ांनी वाढण्याची शक्यता आहे.राज्यात शनिवारपर्यंत ६१ लाख क्विंटल कापूस शेतकर्‍यांनी विकला असून, यातील २६ लाख क्विंटल कापूस भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी केला आहे; पण सीसीआय आणि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे कापूस दर प्रतवारीच्या निकषावर ठरले असल्याने शेतकर्‍यांना हमी दरापेक्षा प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रुपये कमी दर दिले जात आहेत. परिणामी शेतकर्‍यांचा ओढा खासगी बाजाराकडे आहे. असे असले तरी कापसाचे दर वाढतील, या अपेक्षेवर सधन शेतकर्‍यांनी अद्याप कापूस विकण्यासाठी काढलेला नाही. आतापर्यंत बाजारात जो कापूस विकण्यात आला आहे, तो मुख्यत्वे अल्पभूधारक शेतकर्‍यांचा आहे. संक्रांतीनंतर मात्र बाजारपेठेत कापसाची आवक वाढण्याची शक्यता आहे. फरदडीला कापूस येतोच. आता फुलोरा आला असेल, तर शेतकर्‍यांना त्यासाठी रसशोषण किडी, मावा आदीबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. अन्नद्रव्यासाठी डीएपी, युरियाची फवारणी करणे क्रमप्राप्त असल्याचे जेष्ठ कापूस संशोधक डॉ. आदीनाथ पसलावार यांनी स्पष्ट केले. *फरदडीला कापूस येतो२0१२-१३ मध्ये अवकाळी पाऊस आल्यानंतर, त्यावर्षी फरदडपासून शेतकर्‍यांना दोन ते तीन क्विंटल कापसाचे उत्पादन वाढले होते. यावर्षीदेखील अवकाळी पाऊस झाल्याने, उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.