शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला बोनस नाही, बाजारात धान्याचे दर घसरलेलेच!

By admin | Updated: February 10, 2016 02:19 IST

हातात पैसा नसल्याने शेतक-यांची तारांबळ!

अकोला: पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे सलग दहा वर्षांंपासून सरासरी उत्पादन घटल्याने शेतकर्‍यांच्या हातात पैसाच शिल्लक नाही. गतवर्षी पुन्हा पावसाने या संकटात भर टाकल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाच्या घोषणेप्रमाणे कापसाला बोनस नाही आणि बाजारात धान्याचे दर कोसळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विदर्भातील कृषिविकासाचा दर गत बारा वर्षांंपासून कमीच आहे. पुन्हा नैसर्गिक आपत्ती, भूमी अधिग्रहण आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरामुळे या विकासदरात घसरणच सुरू असल्याने विदर्भातील शेतकरी खचला आहे. मागील दहा वर्षांंतील कृषिविकासाचा दर कमी-अधिक या स्वरू पात असल्याचा निष्कर्ष आहे. त्याचे गंभीर परिणाम विदर्भातील शेतकर्‍यांना सोसावे लागत आहेत. गत पाच वर्षांंत तर शेतकर्‍यांच्या परिस्थितीत तसूभरही सुधारणा झाली नसून, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. शेतकर्‍यांना नफ्याऐवजी तोटाच झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. यावर्षी तर सोयाबीन आणि कापसाचे हेक्टरी उत्पादन घटले आहे. शेतकर्‍यांच्या हातात पैसाच शिल्लक नसून, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न या सर्वांंमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यावर्षी मशागतीची कामाची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. शेताला उन्ह मिळावे म्हणून विदर्भातील शेतकरी मार्च महिन्यापासून शेतीच्या मशागतीला सुरुवात करतो; परंतु पैसा हातात नसल्याने शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करण्याच्या मागे लागला आहे. तथापि, पैसा देण्यास सहज कोणी तयार होत नसल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे.