शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला मिळत आहे चार हजारावर भाव

By admin | Updated: April 3, 2015 02:27 IST

शेतक-‍यांजवळचा कापूस संपला; वाढलेले भाव व्यापा-‍यांच्या हिताचे.

नाना हिवराळे /खामगाव : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी व रूईच्या भावामध्ये वाढ झाल्याने कापसाची मागणी वाढली आहे. पर्यायाने कापसाच्या भावातही क्विंटलमागे ३00 ते ४00 रूपये दराने वाढ झाली आहे; परंतु सद्यस्थितीत शेतकर्‍यांच्या घरातच कापूस नसल्याने या वाढत्या भावाचा फायदा केवळ व्यापार्‍यांना होणार असल्याचे दिसून येते. पांढर्‍या सोन्याकडे शेतकर्‍यांचे हमी पीक म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षात गारपीट, नैसर्गिक आपत्ती आणि अत्यल्प पावसामुळे कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच बाजारातही कपाशीला शेतकर्‍यांच्या अपेक्षाएवढा भाव मिळत नसल्याने कपाशीचे पीक घेणे परवडेनासे झाले आहे. यावर्षीच्या २0१४-१५ च्या हंगामात कपाशीला शासनाकडून ३ हजार ९५0 ते ४ हजार ५0 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला होता. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व भारतीय कपास निगम (सीसीआय) यांच्यावतीने कपाशीची खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरूवात होती. खामगाव हे कापसाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असल्याने येथे कपाशीची नेहमीच विक्रमी आवक असते. यावर्षी पणन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा येथे खरेदी केंद्र उघडण्यात आले होते. मार्च अखेर पणन महासंघाची जिल्ह्यात १ लाख ७ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. तर सीसीआयच्यावतीने खामगाव, नांदुरा, मलकापूर व जळगाव जामोद या चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. एकट्या खामगाव केंद्रावर सीसीआयने ३ लाख ५४ हजार ४३७ क्विंटल कापूस खरेदी केली. शेतकर्‍यांचे ऑनलाईन पेमेंट होऊन शेतकर्‍यांना कापसाचे १४१ कोटी ५४ लाख ४५ हजार ६७0 रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांना ४ हजार ७५0 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त भाव यावर्षी मिळालाच नाही. गतवर्षी पाच हजारापेक्षा जास्त भाव कापसाला मिळाला होता. शेतकर्‍यांच्या घरातील कापूस विकल्यानंतर आता मात्र कापसाचे भाव वाढले आहेत. सद्यस्थितीत ४ हजार ३00 ते ४ हजार ४00 रुपये प्रतिक्विंंटल कापसाला भाव मिळत आहे; परंतु जवळपास ९५ टक्के शेतकर्‍यांच्या घरातून कापूस हद्दपार झाला आहे. शेतकर्‍यांना आर्थिक चणचण भासत असल्याने शेतकर्‍यांनी पडेल भावात कापूस विकला आहे. ३ हजार ५00 ते ३ हजार ६00 रुपये दराने शेतकर्‍यांनी कापूस विकला; मात्र आता ४ हजार ३00 ते ४ हजार ४00 रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वाढत्या भावाचा शेतकर्‍यांना फटका बसला असून, वाढलेला भाव व्यापार्‍यांच्या पथ्यावर पडणारा आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकर्‍यांना वाढत्या भावापासून वंचित राहावे लागले आहे.