शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

कापसाला मिळत आहे चार हजारावर भाव

By admin | Updated: April 3, 2015 02:27 IST

शेतक-‍यांजवळचा कापूस संपला; वाढलेले भाव व्यापा-‍यांच्या हिताचे.

नाना हिवराळे /खामगाव : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी व रूईच्या भावामध्ये वाढ झाल्याने कापसाची मागणी वाढली आहे. पर्यायाने कापसाच्या भावातही क्विंटलमागे ३00 ते ४00 रूपये दराने वाढ झाली आहे; परंतु सद्यस्थितीत शेतकर्‍यांच्या घरातच कापूस नसल्याने या वाढत्या भावाचा फायदा केवळ व्यापार्‍यांना होणार असल्याचे दिसून येते. पांढर्‍या सोन्याकडे शेतकर्‍यांचे हमी पीक म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षात गारपीट, नैसर्गिक आपत्ती आणि अत्यल्प पावसामुळे कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच बाजारातही कपाशीला शेतकर्‍यांच्या अपेक्षाएवढा भाव मिळत नसल्याने कपाशीचे पीक घेणे परवडेनासे झाले आहे. यावर्षीच्या २0१४-१५ च्या हंगामात कपाशीला शासनाकडून ३ हजार ९५0 ते ४ हजार ५0 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला होता. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व भारतीय कपास निगम (सीसीआय) यांच्यावतीने कपाशीची खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरूवात होती. खामगाव हे कापसाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असल्याने येथे कपाशीची नेहमीच विक्रमी आवक असते. यावर्षी पणन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा येथे खरेदी केंद्र उघडण्यात आले होते. मार्च अखेर पणन महासंघाची जिल्ह्यात १ लाख ७ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. तर सीसीआयच्यावतीने खामगाव, नांदुरा, मलकापूर व जळगाव जामोद या चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. एकट्या खामगाव केंद्रावर सीसीआयने ३ लाख ५४ हजार ४३७ क्विंटल कापूस खरेदी केली. शेतकर्‍यांचे ऑनलाईन पेमेंट होऊन शेतकर्‍यांना कापसाचे १४१ कोटी ५४ लाख ४५ हजार ६७0 रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांना ४ हजार ७५0 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त भाव यावर्षी मिळालाच नाही. गतवर्षी पाच हजारापेक्षा जास्त भाव कापसाला मिळाला होता. शेतकर्‍यांच्या घरातील कापूस विकल्यानंतर आता मात्र कापसाचे भाव वाढले आहेत. सद्यस्थितीत ४ हजार ३00 ते ४ हजार ४00 रुपये प्रतिक्विंंटल कापसाला भाव मिळत आहे; परंतु जवळपास ९५ टक्के शेतकर्‍यांच्या घरातून कापूस हद्दपार झाला आहे. शेतकर्‍यांना आर्थिक चणचण भासत असल्याने शेतकर्‍यांनी पडेल भावात कापूस विकला आहे. ३ हजार ५00 ते ३ हजार ६00 रुपये दराने शेतकर्‍यांनी कापूस विकला; मात्र आता ४ हजार ३00 ते ४ हजार ४00 रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वाढत्या भावाचा शेतकर्‍यांना फटका बसला असून, वाढलेला भाव व्यापार्‍यांच्या पथ्यावर पडणारा आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकर्‍यांना वाढत्या भावापासून वंचित राहावे लागले आहे.