शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला अद्याप बोनस नाहीच!

By admin | Updated: March 18, 2016 02:11 IST

अधिवेशनाकडे शेतक-यांचे लागले डोळे.

अकोला: कापूूस उत्पादक शेतकर्‍यांना अग्रीम बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली खरी; पण अग्रीम बोनस अद्याप मिळाला नसून, खासगी बाजारात अपेक्षित दर मिळाले नसल्याने सात बारा बघून शेतकर्‍यांना अग्रीम बोनस देण्यात यावे, या मागणीसाठी शेतकर्‍यांचे डोळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. मागील वर्षी विदर्भातील शेतकर्‍यांनी जवळपास १५ लाख ३0 हजार क्विंटल क्षेत्रावर कपाशीची पेरणी केली होती; परंतु पावसाच्या अनियमिततेचा फटका बसल्याने प्रचंड नुकसान झाले असून, हेक्टरी दोन-तीन क्विंटल उतारा आला. परिणामी यावर्षी राज्यातील कापसाचे उत्पादन जवळपास ५0 टक्क्यांनी घटले आहे. उत्पादन खर्चावर आधारित हमी दर नसल्याने शेतकर्‍यांनी या पिकासाठी लावलेला उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांची भिस्त शासनाच्या मदतीवर होती. शासनाने अग्रीम बोनसची घोषणा केल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण अद्याप या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. आजमितीस कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. वरू न दुष्काळाचा सामना करीत आहे. या परिस्थितीत शेतकर्‍यांना तातडीच्या मदतीची गरज असल्याचा सूर शेतकरी नेत्यांमध्ये उमटत आहे.गुजरात शासनाने तेथील शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ६00 रुपये बोनस दिल्याने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि अग्रीम बोनस देण्याची घोषणा शासनाने केल्याने शेतकर्‍यांना या मदतीची प्रतीक्षा होती; परंतु तीन महिने उलटले तरी बोनस न मिळाल्याने शेतकर्‍यांचे लक्ष या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. यावर्षी कापसाचा हमी दर ४१00 रुपये प्रतिक्विंटल आहे; परंतु भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि सीसीआयचा उपअभिकर्ता महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाने कापसाची प्रतवारी बघून प्रत्यक्षात ३८५0 ते ३९00 रुपये प्रतिक्विंटल या दरानेच कापूस खरेदी केला असल्याच्या शेतकर्‍यांनी सुरुवातीला तक्रारी केल्या आहेत. या सर्व परिस्थितीत शासन काय निर्णय घेते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.