शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

कापूस खरेदी : पाचशे कोटी रू पयांचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 18:23 IST

राज्य शासनाने १८०० कोटी रू पयांची बँक गॅरटी घेतल्याने पणन महासंघाला दिलासा मिळाला आहे.

अकोला : महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने यावर्षी ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असून,आतापर्र्यत १,३२५ कोटी रू पयांचे चुकारे करण्यात आले आहेत.पंरतु ५२५ कोटी रू पये थकले आहेत. राज्य शासनाने १८०० कोटी रू पयांची बँक गॅरटी घेतल्याने पणन महासंघाला दिलासा मिळाला आहे.आधारभूत किमतीपेक्षा दर जास्त व विक्री केलेल्या कापसाची रक्कम लगेच मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पणन महासंघाच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली होती. यावर्षी मात्र शेतकऱ्यांनी पणन महासंघाला पसंती दिली असून, खरेदी केंद्रावर दररोज कापसाची आवक वाढत आहे. राज्यात आतापर्यंत ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.खरेदी केलेला हा कापूूस १,८५० कोटी रू पयांचा असून, शेतकºयांना त्यातील १,३२५ कोटी रू पयांचे चुकारे करण्यात आले आहेत. उर्वरित चुकारे देण्याची प्रक्रिया संथ होती.दरम्यान,उपमुख्यमंत्री अजित पवार गत आठवड्यात अमरावती दौºयावर असताना महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या माध्यमातून पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख तसेच संचालक मंडळ पवार यांना भेटून पणन महासंघाची माहिती दिली . शेतकºयांचे चुकारे करायचे असतील तर शासनाला बँकेची गँरटी घ्यावी लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.शासनाने याची दखल घेत १८०० कोटी रू पयांची बँक गॅरंटी घेतली आहे.त्यामुळे पणन महासंघाला बॅकाकडून कर्ज मिळणे सुलभ झाले असून,लवकरच उर्वरित चुकारे केले जाणार आहेत. पणन महासंघाने यावर्षी जरी ३३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी केला असला तरी भारतीय कापूस महामंडळ १५ लाख क्ंिवटलच्यावर पणन महासंघाला कमीशन देणार नाही.यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.यासंदर्भात पणन महासंघाच्या संचालक मंडळाची १२ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, उपमुख्यमंत्री व पणन मंत्र्यानाही भेटणार आहेत.बँक गॅरंटी वाढवावी ही देखील मागणी केली जाणार असल्याचे वृत्त आहे.

 ‘पनण’ने यावर्षी १,८५० कोटी रू पयांचा कापूस खरेदी केला आहे.१,३२५ कोटींचे चुकारे केले आहेत.उर्वरित चुकाºयांची प्रक्रिया सुरू आहे.शासनाने बँक गॅरंटी घेतल्याने दिलासा मिळाला आहे.गँरटी वाढवून मिळावी ही मागणी करणार आहे.- राजाभाऊ देशमुख,अध्यक्ष,पणन महासंघ,अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस