शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्त्यांनी वाढवला एसटीचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST

अकोला : पावसाळ्यात जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांसह अंतर्गत रस्त्यांचीही पुरती वाट लागली असून, बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. जनतेच्या सेवेसाठी ...

अकोला : पावसाळ्यात जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांसह अंतर्गत रस्त्यांचीही पुरती वाट लागली असून, बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. जनतेच्या सेवेसाठी सतत रस्त्यावर धावत असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांचे खड्ड्यांमुळे प्रचंड नुकसान होत असून, अशा रस्त्यांमुळे एसटीच्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. एवढेच नव्हे, तर खराब रस्त्यामुळे तेल्हारा ते जळगाव जामोद ही बससेवा गत अनेक दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनाकाळात एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. त्यानंतर हळूहळू बससेवा सुरळीत झाली आहे. तरीही, अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने एसटीची आर्थिक ओढाताण होत आहे. अशातच जिल्ह्यातील पाचही आगारांमधून धावणाऱ्या बसगाड्यांना खराब रस्त्यांचा मोठा फटका बसत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बसगाड्या खिळखिळ्या झाल्या असून, पूर्वीच्या तुलनेत लवकरच या गाड्यांची दुरुस्ती करावी लागत आहे. शिवाय, अपेक्षित गतीवर वाहन चालत नसल्याने इंधनाचीही खपत अधिक होत आहे. त्यामुळे एसटीला मोठा खर्च करावा लागत आहे.

जिल्ह्यातील आगार आणि सुरू असलेल्या बस

आगार बस

अकोला १ ३०

अकोला २ ३२

अकोट ३०

मूर्तिजापूर २०

तेल्हारा २०

तेल्हारा ते जळगाव जामाेद बसफेऱ्या बंद

जिल्ह्यातील सर्वच मार्गांची चाळण झाली असली, तरी या रस्त्यांवरून बस चालूच आहेत. कोविडकाळात ग्रामीण भागातील बसेस अजूनही सुरू झालेल्या नाहीत. तथापि, रस्ता खराब असल्यामुळे तेल्हारा ते जळगाव जामोद या मार्गावरील फेऱ्या गत अनेक दिवसांपासून बंद आहेत.

ग्रामीण भागातील बसेस बंदच

कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील फेऱ्या बंदच आहेत. ग्रामीण भागातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने बसफेऱ्या सुरूच झाल्या नाहीत. जिल्ह्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते खड्डेमय झाले आहेत. तथापि, कोरोनामुळे आधीपासूनच ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने खड्ड्यांमुळे ही सेवा बंद असल्याचे म्हणता येणार नाही, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एसटीचा खर्च वाढला

जिल्ह्यातील पाचही आगारांमधील बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात गत काही महिन्यांपासून मोठी वाढ झाली आहे. खड्ड्यांमुळे टायर लवकर खराब होत आहेत. शिवाय, गाडीच्या चेसिसचे मोठे नुकसान होते. खिडक्या, दरवाजेही खिळखिळे होत असल्याने ते बदलण्याशिवाय पर्याय नसतो. अनेक गाड्यांमधील आसनेही खिळखिळी झाली आहेत. यामुळे एसटीचा खर्च वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोरोनामुळे आधीच अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याने उत्पन्न घटले आहे. आता ऑफ सिझन असल्याने त्यात

भरच पडली आहे. खराब रस्त्यांमुळे बसगाड्या खिळखिळ्या होत असून, देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. त्यानंतरही एसटीने अपवाद वगळता अखंडित सेवा सुरू ठेवली आहे.

-चेतना खिरवाडकर, विभाग नियंत्रक, अकोला