अकाेला : काेराेनामुळे मध्यम व किरकाेळ व्यावसायिकांचे उद्याेग, व्यवसाय डबघाईस आले आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी साेमवारी भाजप ओबीसी आघाडीचे महानगराध्यक्ष जयंत मसने, संजय गोटफोडे, रामेश्वर वानखडे, संजय तिकांडे, दिलीप भरणे, प्रदीप मांगूळकर, देवाशिष काकड यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली़
तरुणांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा!
अकाेला : १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे़ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नाेंदणी केल्यानंतरच संबंधित व्यक्तीला लस दिली जाणार असल्याने युवकांनी २८ एप्रिलपासून तातडीने नाेंदणी करण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी केले आहे़ काेराेनाचे संकट लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे पालन करून लसीकरण केंद्रांत गर्दी टाळण्याचे आवाहन धाेत्रे यांनी केले आहे़
जलवाहिनी टाकली; माती रस्त्यावर
अकाेला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम वेगात सुरू आहे़ जुने शहरातील डाबकी राेड पाेलीस ठाण्यासमाेर जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रस्त्यालगत खाेदकाम केले हाेते. जाळे टाकल्यानंतर रस्त्यावर माेठ्या प्रमाणात माती साचली असून ती न हटविता कंत्राटदाराने गाशा गुंडाळला आहे़ यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे़
अकाेला : काेराेना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिका प्रशासनाने जनता भाजी बाजार तसेच जैन मंदिरालगतच्या जुना भाजी बाजारात व्यवसाय करण्यावर निर्बंध घातले आहेत़ या ठिकाणी व्यावसायिकांनी व्यवसाय थाटल्यास त्यांना तातडीने हुसकावण्यासाठी मनपा प्रशासनाने बाजार व अतिक्रमण विभागावर जबाबदारी साेपवली आहे़
३ मे राेजी उघडणार पार्किंगची निविदा
अकाेला : शहरात विविध कामांसाठी दाखल हाेणाऱ्या नागरिकांना वाहने ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाकडून पार्किंग उपलब्ध करून दिली जाणार आहे़ त्यासाठी शहरातील १३ जागांची निवड करण्यात आली असून भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या जागेसाठी मनपाने निविदा प्रक्रिया राबवली आहे़ येत्या ३ मे राेजी निविदा उघडली जाणार आहे़
सफाई कर्मचाऱ्यांना हवी लाेटगाडी!
अकाेला : अरुंद व चिंचाेळ्या सर्व्हिस लाइनमध्ये जमा हाेणारा केरकचरा व घाण जमा करताना महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ अशा ठिकाणी नाल्यांची स्वच्छता केल्यानंतर जमा झालेली घाण व कचरा डाेक्यावर उचलून आणणे शक्य नसल्याने कर्मचाऱ्यांकडून लाेटगाडीची मागणी केली जात आहे़ मनपाने तयार केलेल्या अनेक लाेटगाड्या नादुरुस्त आहेत़