शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या घराकडे मनपाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:17 IST

शहरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. संशयित किंवा ...

शहरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. संशयित किंवा कोरोना बाधित रुग्णांचा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्वप्रथम मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने सतर्क होऊन रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यापासून ते संबंधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्या इत्थंभूत माहितीची नोंद ठेवण्याची गरज आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णाची माहिती प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेने मलेरिया विभागाला पूर्वसूचना देऊन फवारणीसाठी पथके रवाना करणे, बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्याची आवश्यकता असताना या विभागाची यंत्रणा ताेकडी पडत असल्यामुळे समस्यांचे निराकरण हाेत नसल्याचे दिसत आहे. शहरात काेराेनाबाधितांची संख्या वाढत चालली असल्यामुळे नागरिकांनीच सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे.

रुग्णसंख्या वाढली !

मनपाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख मागील अनेक दिवसांपासून आजारी रजेवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे डाॅ. अस्मिता पाठक यांच्याकडे प्रभार साेपविण्यात आला असून त्यादेखील आजारी आहेत. अशावेळी अधीनस्थ अधिकारी व कर्मचारी इमानेइतबारे कामकाज करीत आहेत. या विभागाकडे शहरातील पाॅझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी उपलब्ध असली, तरी त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत असल्यामुळे मनपाची यंत्रणा सैरभैर झाली आहे.

झाेन अधिकारी तणावात

गतवर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी महिन्यापासून काेराेनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ हाेत असल्याचे चित्र समाेर आले आहे. वर्तमानस्थितीत शासकीय असाे वा खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यांत प्रादुर्भाव वाढल्याचे पाहून मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी झाेन अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत वाढ केली आहे. काेराेनाचा वाढता प्रसार पाहता काही झाेन अधिकारी तणावात असल्याची माहिती आहे.