शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सुटीनंतर संसर्ग रोखण्याची जबाबदारी रुग्णांचीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:02 IST

रुग्णांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांची काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागामार्फत त्या रुग्णाची पुन्हा तपासणी होत नाही.भाव्य संसर्ग रोखण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित रुग्णांवर आहे.

अकोला: कोरोनाबधित रुग्णाला उपचारानंतर कुठल्याही तपासणीशिवाय दहाव्या दिवशी थेट घरी सोडले जाते; मात्र त्यानंतर आरोग्य विभागामार्फत त्या रुग्णाची पुन्हा तपासणी होत नाही. त्यामुळे कोरोनाचा संभाव्य संसर्ग रोखण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित रुग्णांवर आहे. त्यासाठी रुग्णांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांची काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्याही पाचशेच्यावर गेली आहे. अशातच ‘आयसीएमआर’च्या नवीन नियमावलीनुसार, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची पुन्हा तपासणी न करता दहाव्या दिवशी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्याचे निर्देश आहेत. ज्या रुग्णांना काही लक्षणे असतील, त्यांना संस्थागत अलगीकरण कक्षात तर ज्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशा रुग्णांना ‘होम क्वारंटीन’ केले जाते; मात्र त्यानंतर आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचे त्या रुग्णांकडे दुर्लक्ष होते. परिणामी, या रुग्णांकडून समूह संक्रमणाचा सर्वाधिक धोका संभवू शकतो, अशा परिस्थितीत कोरोना या आजारातून पूर्णत: बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्य यंत्रणेने दिलेल्या नियमांचे पालन केल्यास संभाव्य धोका टाळणे शक्य होईल.-निष्काळजी ठरू शकते घातक!‘होम क्वारंटीन’ केलेल्या रुग्णांना १४ दिवस घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या जातात; मात्र अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करून इतरांमध्ये मिसळतात. रुग्णांची ही निष्काळजी त्यांच्या कुटुंबासह परिसरातील नागरिकांसाठी घातक ठरू शकते.-रुग्णांकडून घेतले जाते कलम १४४ पत्रसुटीनंतर रुग्णांनी ‘होम क्वारंटीन’च्या नियमांची अंमलबजावणी करावी, या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत त्यांच्याकडून कलम १४४ चे पत्र भरून घेतल्या जाते. त्यानुसार नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले जाते.रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला सुटी दिली जाते; परंतु त्याच्यामार्फत संसर्ग पसरू नये, यानुषंगाने रुग्णांना काही सूचना दिल्या जातात. तसेच त्यांच्याकडून कलम १४४ चे पत्र भरून घेतल्या जाते. शिवाय, आरोग्य सेतूमार्फत त्यांच्यावर लक्ष दिले जाते. तसेच आरोग्य विभागही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला