शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

लिंबू उत्पादक शेतकऱ्यांवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST

पातूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मेच्या पहिल्या आठवड्यापासूनच लॉकडाऊन घोषित केले. ३१ मेपर्यंत आता लॉकडाऊन वाढविले आहे. त्यामुळे दोन ...

पातूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मेच्या पहिल्या आठवड्यापासूनच लॉकडाऊन घोषित केले. ३१ मेपर्यंत आता लॉकडाऊन वाढविले आहे. त्यामुळे दोन आठवड्यांपासून लिंबू मार्केट बंद आहे. त्याचा फटका तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून कोट्यवधी रुपयांचे लिंबू उत्पादन मातीमोल झाले आहेत.

महाराष्ट्रात उत्पादित केलेले लिंबू हे इतर राज्यांत निर्यात केले जातात व मोठ्या बाजारपेठांमध्ये लिंबूची मागणी मोठ्या प्रमाणात आहे व भावसुद्धा चांगले मिळत आहेत. स्थानिक व्यापारी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लिंबू विकत घेऊन इतर राज्यांत निर्यात करतात; परंतु जिल्हाबंदी, लॉकडाऊनमुळे स्थानिक व्यापाऱ्यांनीसुद्धा शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली आहे तर काही व्यापारी शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने विकत घेत आहेत.

फोटो:

शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ

लिंबूला भाव मिळत नसल्याने स्थानिक लिंबू उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

उन्हाळ्यात लिंबूला मागणी जास्त असते; परंतु कोरोनाने कहर केला असून शेतात राबराब राबून सुद्धा हाती काहीच उरत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देऊन लिंबू बाजारपेठ उघडी करावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.