शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
4
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
5
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
6
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
7
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
8
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
9
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
10
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
12
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
13
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
14
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
15
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
16
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
17
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
18
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
19
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
20
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

Corona Vaccine : लसच उपाय, लसीकरणानंतर अकोला जिल्ह्यात एकही मृत्यू नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 12:01 IST

Corona Vaccine: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच मृत्यूचाही आकडा वाढत आहे. मात्र, कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती आहे. तसेच कोविडचा संसर्ग झाल्यास त्याचा गंभीर परिणाम रुग्णावर झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे कोरोनावर लस हाच उपाय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोविड लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. मोहिमेंतर्गत आतापर्यंत सुमारे २३ हजार लाभार्थींनी लसीचे दोन्ही डोस घेतले. लसीकरणानंतर काही लाभार्थींना कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र, त्याचा प्रभाव गंभीर नसल्याचेही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. तसेच लस घेतल्यानंतर कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नसल्याचीही माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, अनेकांना गंभीर लक्षणे आहेत. यामध्ये कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अनेक रुग्ण आहेत. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाचे गंभीर लक्षणे आढळून आले नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत लस प्रभावी शस्त्र ठरत असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

 

पहिल्या डोसनंतर जिल्ह्यातील केवळ सहा टक्के

पहिला डोस घेतल्यानंतर सहा टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये सुरुवातीच्या काळात ‘फ्रंटलाइन वर्कर’ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस घेतल्यानंतर सुमारे २० ते २५ दिवसांनी ॲन्टिबॉडीज तयार होतात.

दोन्ही डोस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग तसेच वारंवार हात धुणे आदी नियमांचे पालन करावे लागते. लसीमुळे रुग्ण गंभीर होत नाहीत.

लसीकरणामुळे नागरिकांच्या शरीरात ॲन्टिबॉडीज तयार होतात. त्यामुळे कोरोना झाला, तरी त्याचा प्रभाव कमी होतो. रुग्ण गंभीर स्थितीत पोहोचत नाही. अनेक रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेऊ शकतात. रुग्ण गंभीर होत नसल्याने मृत्यूचा प्रश्नच येत नाही.

दोन्ही डोसनंतर केवळ ०.२ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरू झालेली लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. आधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि आता सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जात आहे. दोन्ही लस घेतलेल्यांपैकी केवळ ०.२ टक्के लोकांना कोविडचा संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. अशा रुग्णांना कोविडची सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे असे रुग्ण डॉक्टरांच्या मार्गदर्शनात घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

कोराेनाची लस सुरक्षित असून त्याचे चांगले परिणामही समोर येत आहेत. लस घेतल्यानंतरही काहींना कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र, दोन्ही डोस घेतल्यानंतर ठराविक काळानंतर कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. ही चांगली बाब असून नागरिकांनी लस घेण्यास पुढाकार घ्यावा.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला

 

पहिला डोस - १,४०,४३१

 

दुसरा डोस - २५,३३०

 

एकूण - १,६५,७६१

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस