शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोना: उपचाराचे दहा दिवस रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:11 IST

उपचार नसला तरी रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर जास्त भर असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनावर कुठलाच उपचार नाही, औषध नाही, लस नाही; मग रुग्णालयात उपचार होतो तरी कशाचा, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उद््भवतात; मात्र उपचार नसला तरी रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर जास्त भर असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.कोरोना आणि त्याच्या उपचार पद्धतीवर अनेकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जातात. कोरोनाचा रुग्ण म्हणून त्याला वेगळी वागणूक मिळते म्हणून अनेक जण रुग्णालयात जाणेही टाळतात. शिवाय, सुटी देण्यापूर्वी त्याची पुन्हा चाचणी होत नसल्याने तो निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह, या भीतीने अनेक जण त्या रुग्णाजवळही जाण्यास टाळतात.नागरिकांच्या मनातील भीती आणि वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. काय म्हणतात हे डॉक्टर जाणून घेऊया.

रुग्णाला केव्हा दाखल केले जाते?सर्वप्रथम रुग्णाची प्राथमिक चाचणी केली जाते. सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढला जातो. सोबतच त्याचा स्वॅब घेण्यात येतो. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कोविड वॉर्डात दाखल केले जाते. अन्यथा इतर आजारावर आवश्यक उपचार देऊन रुग्णाला सुटी दिली जाते.

रुग्णालयात अशी आहे रुग्णांची दिनचर्यासकाळी ८ वाजता नाश्ता दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने पोहे, उपमा, बिस्कीट, दूध किंवा चहा. दुपारी १२ वाजता जेवण. यामध्ये कडधान्य असलेली भाजी, वरण भात, पोळी, शेंगदाण्याचा लाडू, अंडे, ड्रायफ्रुट्स, फळे. यामुळे रोगप्रतिकारकशक्तीही वाढण्यास मदत होते.

दिवसातून चार वेळा डॉक्टरांची फेरीकोविड वॉर्डात दिवसातून चार वेळा डॉक्टरांची फेरी असते.यामध्ये प्रामुख्याने रुग्णांना श्वास घेण्यास होणारा त्रास यावर विशेष लक्ष दिले जाते.

‘त्या’ रुग्णांपासून संसर्गाचा धोका नाहीउपचारानंतर रुग्णाला कोरोनाची लक्षणे नसतील, तर त्याला दहाव्या दिवशी सुटी देण्यासंदर्भात आयसीएमआरच्या निर्देश आहेत. हा रुग्ण कोरोना निगेटिव्ह नसला, तरी त्यापासून संसर्ग होण्याची भीती नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे; परंतु लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्याला रुग्णालयातून सुटी दिली जात नाही.

रुग्ण लवकर बरा व्हावा यासाठी त्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर जास्त भर असतो. त्या अनुषंगाने रुग्णांना पौष्टिक आहार दिला जातो. रुग्णाला लक्षणे असल्यास त्याचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्याला सुटी दिली जात नाही.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला