शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कोरोना: उपचाराचे दहा दिवस रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:11 IST

उपचार नसला तरी रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर जास्त भर असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनावर कुठलाच उपचार नाही, औषध नाही, लस नाही; मग रुग्णालयात उपचार होतो तरी कशाचा, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उद््भवतात; मात्र उपचार नसला तरी रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर जास्त भर असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.कोरोना आणि त्याच्या उपचार पद्धतीवर अनेकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जातात. कोरोनाचा रुग्ण म्हणून त्याला वेगळी वागणूक मिळते म्हणून अनेक जण रुग्णालयात जाणेही टाळतात. शिवाय, सुटी देण्यापूर्वी त्याची पुन्हा चाचणी होत नसल्याने तो निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह, या भीतीने अनेक जण त्या रुग्णाजवळही जाण्यास टाळतात.नागरिकांच्या मनातील भीती आणि वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. काय म्हणतात हे डॉक्टर जाणून घेऊया.

रुग्णाला केव्हा दाखल केले जाते?सर्वप्रथम रुग्णाची प्राथमिक चाचणी केली जाते. सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढला जातो. सोबतच त्याचा स्वॅब घेण्यात येतो. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कोविड वॉर्डात दाखल केले जाते. अन्यथा इतर आजारावर आवश्यक उपचार देऊन रुग्णाला सुटी दिली जाते.

रुग्णालयात अशी आहे रुग्णांची दिनचर्यासकाळी ८ वाजता नाश्ता दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने पोहे, उपमा, बिस्कीट, दूध किंवा चहा. दुपारी १२ वाजता जेवण. यामध्ये कडधान्य असलेली भाजी, वरण भात, पोळी, शेंगदाण्याचा लाडू, अंडे, ड्रायफ्रुट्स, फळे. यामुळे रोगप्रतिकारकशक्तीही वाढण्यास मदत होते.

दिवसातून चार वेळा डॉक्टरांची फेरीकोविड वॉर्डात दिवसातून चार वेळा डॉक्टरांची फेरी असते.यामध्ये प्रामुख्याने रुग्णांना श्वास घेण्यास होणारा त्रास यावर विशेष लक्ष दिले जाते.

‘त्या’ रुग्णांपासून संसर्गाचा धोका नाहीउपचारानंतर रुग्णाला कोरोनाची लक्षणे नसतील, तर त्याला दहाव्या दिवशी सुटी देण्यासंदर्भात आयसीएमआरच्या निर्देश आहेत. हा रुग्ण कोरोना निगेटिव्ह नसला, तरी त्यापासून संसर्ग होण्याची भीती नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे; परंतु लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्याला रुग्णालयातून सुटी दिली जात नाही.

रुग्ण लवकर बरा व्हावा यासाठी त्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर जास्त भर असतो. त्या अनुषंगाने रुग्णांना पौष्टिक आहार दिला जातो. रुग्णाला लक्षणे असल्यास त्याचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्याला सुटी दिली जात नाही.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला