शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना: उपचाराचे दहा दिवस रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:11 IST

उपचार नसला तरी रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर जास्त भर असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनावर कुठलाच उपचार नाही, औषध नाही, लस नाही; मग रुग्णालयात उपचार होतो तरी कशाचा, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उद््भवतात; मात्र उपचार नसला तरी रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर जास्त भर असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.कोरोना आणि त्याच्या उपचार पद्धतीवर अनेकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जातात. कोरोनाचा रुग्ण म्हणून त्याला वेगळी वागणूक मिळते म्हणून अनेक जण रुग्णालयात जाणेही टाळतात. शिवाय, सुटी देण्यापूर्वी त्याची पुन्हा चाचणी होत नसल्याने तो निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह, या भीतीने अनेक जण त्या रुग्णाजवळही जाण्यास टाळतात.नागरिकांच्या मनातील भीती आणि वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. काय म्हणतात हे डॉक्टर जाणून घेऊया.

रुग्णाला केव्हा दाखल केले जाते?सर्वप्रथम रुग्णाची प्राथमिक चाचणी केली जाते. सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढला जातो. सोबतच त्याचा स्वॅब घेण्यात येतो. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कोविड वॉर्डात दाखल केले जाते. अन्यथा इतर आजारावर आवश्यक उपचार देऊन रुग्णाला सुटी दिली जाते.

रुग्णालयात अशी आहे रुग्णांची दिनचर्यासकाळी ८ वाजता नाश्ता दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने पोहे, उपमा, बिस्कीट, दूध किंवा चहा. दुपारी १२ वाजता जेवण. यामध्ये कडधान्य असलेली भाजी, वरण भात, पोळी, शेंगदाण्याचा लाडू, अंडे, ड्रायफ्रुट्स, फळे. यामुळे रोगप्रतिकारकशक्तीही वाढण्यास मदत होते.

दिवसातून चार वेळा डॉक्टरांची फेरीकोविड वॉर्डात दिवसातून चार वेळा डॉक्टरांची फेरी असते.यामध्ये प्रामुख्याने रुग्णांना श्वास घेण्यास होणारा त्रास यावर विशेष लक्ष दिले जाते.

‘त्या’ रुग्णांपासून संसर्गाचा धोका नाहीउपचारानंतर रुग्णाला कोरोनाची लक्षणे नसतील, तर त्याला दहाव्या दिवशी सुटी देण्यासंदर्भात आयसीएमआरच्या निर्देश आहेत. हा रुग्ण कोरोना निगेटिव्ह नसला, तरी त्यापासून संसर्ग होण्याची भीती नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे; परंतु लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्याला रुग्णालयातून सुटी दिली जात नाही.

रुग्ण लवकर बरा व्हावा यासाठी त्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर जास्त भर असतो. त्या अनुषंगाने रुग्णांना पौष्टिक आहार दिला जातो. रुग्णाला लक्षणे असल्यास त्याचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्याला सुटी दिली जात नाही.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला