शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

कोरोनाने शिकविले मार्केटिंग; तब्बल आठ टन आंब्यांची थेट ग्राहकाला विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

अकोला : कोरोनाकाळात शेतमालाला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली. मात्र, याच कोरोनाने अनेक शेतकऱ्यांना ...

अकोला : कोरोनाकाळात शेतमालाला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली. मात्र, याच कोरोनाने अनेक शेतकऱ्यांना स्वत: मार्केटिंग करणे शिकविले. कापशी तलाव येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील ८ टन आंब्यांची थेट ग्राहकांपर्यंत विक्री केली. लॉकडाऊनच्या काळात त्याने ही किमया साधली आहे.

लॉकडाऊनमुळे बहुतांश शेतकऱ्यांना पडलेल्या दरात व्यापाऱ्यांना माल विकावा लागला. आंबा उत्पादकांवर हीच परिस्थिती आली. मात्र, याच लॉकडाऊनमध्ये थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून तिप्पट नफा कमाविण्याची किमया कापशी तलाव येथील शेतकरी डॉ. विजय म्हैसने यांनी साधली. डॉ. म्हैसने हे एका महाविद्यायात प्राध्यापक आहेत. त्यांची कापशी तलाव येथे दोन एकर आमराई आहे. या शेतात आंब्याची २४० झाडे आहेत. डॉ. म्हैसने हे दरवर्षी व्यापाऱ्यांना आंबा विकत होते; परंतु यंदा लॉकडाऊन असल्याने व्यापारी कमी दरात आंबा मागत होते. काबाडकष्ट करून पिकविलेला आंबा कमी दरात कसा विकावा, असा प्रश्न त्यांना पडला. यावेळी शेतकरी डॉ. म्हैसने यांनी खचून न जाता हा दर्जेदार आंबा स्वत: थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे ठरविले. त्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला. डॉ. म्हैसने यांनी जवळपास ८ टन आंब्याची विक्री केली.

सोशल मीडिया बनले माध्यम

एका शेतकऱ्याला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून आंबा विक्री सोपे नसल्याचे डाॅ. म्हैसने यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. एक जाहिरात तयार करून मित्रमंडळी व नातेवाइकांच्या सहकार्याने ही जाहिरात सर्वत्र पाठविली. त्यामुळे त्यांना अपेक्षित प्रतिसादही मिळाला.

कमविला तिप्पट नफा!

शेतकरी डॉ. म्हैसने हे दरवर्षी व्यापाऱ्यांना आंबा विकत असतात. यामाध्यमातून त्यांना दीड लाख रुपये नफा मिळतो. मात्र, यंदा हाच आंबा थेट ग्राहकांना विकल्याने त्यांना ५ लाख ५० हजार रुपयांचा म्हणजेच तिप्पट नफा मिळाला आहे.

मित्राचा ७ टन गावरान आंबाही विकला!

शेतकरी डॉ. म्हैसने यांचे मित्र पातूर येथील शेतकरी रमेश निमकंडे यांचा ७ टन गावरान आंबा होता. शेतकरी निमकंडे यांना व्यापाऱ्यांनी ५०-५५ रुपये प्रतिकिलोने मागितला होता. मात्र, शेतकरी निमकंडे यांचाही आंबा डॉ. म्हैसने यांनी थेट ग्राहकांना विकला. या आंब्याला १५० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

चार जिल्ह्यांत पोहोचविला आंबा

शेतकरी म्हैसने यांनी आंबा केवळ अकोल्यातच नव्हे तर वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातही पोहोचविला. खासगी बस, एसटी बस किंवा एखाद्या खासगी वाहनाने त्यांनी बदाम २ टन तर केसर आंबा ६ टन विक्री केला.

याकरिता त्यांना मित्रमंडळींचीही मदत मिळाली.

शेतकऱ्याने मनावर घेऊन परिश्रम घेण्याची तयारी ठेवल्यास स्वत: पिकविलेल्या शेतमालातून तिप्पट नफा कमविता येतो. शेतकऱ्याचा माल व्यापारी प्रक्रिया करून विकतो व नफा कमावितो. हाच नफा शेतकऱ्याला मिळू शकतो.

- डॉ.विजय म्हैसने, शेतकरी, कापशी