शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोनाने शिकविले मार्केटिंग; तब्बल आठ टन आंब्यांची थेट ग्राहकाला विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

अकोला : कोरोनाकाळात शेतमालाला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली. मात्र, याच कोरोनाने अनेक शेतकऱ्यांना ...

अकोला : कोरोनाकाळात शेतमालाला दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हानी सहन करावी लागली. मात्र, याच कोरोनाने अनेक शेतकऱ्यांना स्वत: मार्केटिंग करणे शिकविले. कापशी तलाव येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील ८ टन आंब्यांची थेट ग्राहकांपर्यंत विक्री केली. लॉकडाऊनच्या काळात त्याने ही किमया साधली आहे.

लॉकडाऊनमुळे बहुतांश शेतकऱ्यांना पडलेल्या दरात व्यापाऱ्यांना माल विकावा लागला. आंबा उत्पादकांवर हीच परिस्थिती आली. मात्र, याच लॉकडाऊनमध्ये थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून तिप्पट नफा कमाविण्याची किमया कापशी तलाव येथील शेतकरी डॉ. विजय म्हैसने यांनी साधली. डॉ. म्हैसने हे एका महाविद्यायात प्राध्यापक आहेत. त्यांची कापशी तलाव येथे दोन एकर आमराई आहे. या शेतात आंब्याची २४० झाडे आहेत. डॉ. म्हैसने हे दरवर्षी व्यापाऱ्यांना आंबा विकत होते; परंतु यंदा लॉकडाऊन असल्याने व्यापारी कमी दरात आंबा मागत होते. काबाडकष्ट करून पिकविलेला आंबा कमी दरात कसा विकावा, असा प्रश्न त्यांना पडला. यावेळी शेतकरी डॉ. म्हैसने यांनी खचून न जाता हा दर्जेदार आंबा स्वत: थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे ठरविले. त्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला. डॉ. म्हैसने यांनी जवळपास ८ टन आंब्याची विक्री केली.

सोशल मीडिया बनले माध्यम

एका शेतकऱ्याला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून आंबा विक्री सोपे नसल्याचे डाॅ. म्हैसने यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. एक जाहिरात तयार करून मित्रमंडळी व नातेवाइकांच्या सहकार्याने ही जाहिरात सर्वत्र पाठविली. त्यामुळे त्यांना अपेक्षित प्रतिसादही मिळाला.

कमविला तिप्पट नफा!

शेतकरी डॉ. म्हैसने हे दरवर्षी व्यापाऱ्यांना आंबा विकत असतात. यामाध्यमातून त्यांना दीड लाख रुपये नफा मिळतो. मात्र, यंदा हाच आंबा थेट ग्राहकांना विकल्याने त्यांना ५ लाख ५० हजार रुपयांचा म्हणजेच तिप्पट नफा मिळाला आहे.

मित्राचा ७ टन गावरान आंबाही विकला!

शेतकरी डॉ. म्हैसने यांचे मित्र पातूर येथील शेतकरी रमेश निमकंडे यांचा ७ टन गावरान आंबा होता. शेतकरी निमकंडे यांना व्यापाऱ्यांनी ५०-५५ रुपये प्रतिकिलोने मागितला होता. मात्र, शेतकरी निमकंडे यांचाही आंबा डॉ. म्हैसने यांनी थेट ग्राहकांना विकला. या आंब्याला १५० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

चार जिल्ह्यांत पोहोचविला आंबा

शेतकरी म्हैसने यांनी आंबा केवळ अकोल्यातच नव्हे तर वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातही पोहोचविला. खासगी बस, एसटी बस किंवा एखाद्या खासगी वाहनाने त्यांनी बदाम २ टन तर केसर आंबा ६ टन विक्री केला.

याकरिता त्यांना मित्रमंडळींचीही मदत मिळाली.

शेतकऱ्याने मनावर घेऊन परिश्रम घेण्याची तयारी ठेवल्यास स्वत: पिकविलेल्या शेतमालातून तिप्पट नफा कमविता येतो. शेतकऱ्याचा माल व्यापारी प्रक्रिया करून विकतो व नफा कमावितो. हाच नफा शेतकऱ्याला मिळू शकतो.

- डॉ.विजय म्हैसने, शेतकरी, कापशी