शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोरोना संचारबंदीचा फटका : जेवण आणि रात्रीचा मुक्काम फुटपाथवरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 10:16 IST

अन्नदानामुळे या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची भूक भागविली जाते; पण रात्रीच्या वेळी त्यांच्यावर फुटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे.

अकोला : सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्याबाहेरील आलेले रुग्ण संचारबंदी अन् सीमाबंदीमुळे जिल्ह्यातच अडकले आहेत. दवाखान्यातून सुट्टी झाली, तरी त्यांना घरी परत जाता येईना. अशा परिस्थितीत काही दानशूर व्यक्तींकडून होत असलेल्या अन्नदानामुळे या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची भूक भागविली जाते; पण रात्रीच्या वेळी त्यांच्यावर फुटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे.पश्चिम विदर्भातील मेडिकल हब म्हणून अकोल्याची ओळख आहे. म्हणूनच जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील बहुतांश रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अशातच गरीब रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालय वर्दानच ठरत आहे. म्हणूनच दररोज शेकडो रुग्ण येथे उपचारासाठी येतात; पण कोरोनाच्या पृष्ठभूमिवर २६ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी अन् जिल्ह्यांतर्गत सीमा बंदी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे उपचारासाठी आलेले अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक रुग्णालयातच अडकले आहेत. रुग्णांना कसेबसे रुग्णालयात जागा मिळत असली, तरी त्यांच्या नातेवाइकांना फुटपाथवरच दिवस काढावे लागत असल्याचे वास्तव आहे. सीमाबंदी असल्याने गावी परतही जाता येईना; पण अन्नदात्यांच्या मदतीने त्यांच्या पोटाची खडगी भागवण्यास मदत होत आहे. ना निवारा ना अन् आणखी किती दिवस उघड्यावरचे जीवन जगावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या शहरातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक अडकलेअमरावती, बडनेरा, अंजनगाव, नागपूर, हिंगोली यासह जवळपासच्या इतर जिल्ह्यांमधीलही रुग्ण व त्यांचे नातेवाइक सर्वोपचार रुग्णालयातच अडकले असल्याची माहिती आहे.

आस घरवापसीचीउपचारासाठी अकोल्यात आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक सीमाबंदीमुळे जिल्ह्यात अडकले आहेत. स्वत:चं घर असूनही उघड्यावरचे जीवन जगावं लागत आहे. त्यामुळे ही संचारबंदी अन् सीमाबंदी कधी हटणार अन् आपण घरी कधी जाणार, अशी आस त्यांना लागली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस