शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

कोरोना संचारबंदीचा फटका : जेवण आणि रात्रीचा मुक्काम फुटपाथवरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 10:16 IST

अन्नदानामुळे या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची भूक भागविली जाते; पण रात्रीच्या वेळी त्यांच्यावर फुटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे.

अकोला : सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्याबाहेरील आलेले रुग्ण संचारबंदी अन् सीमाबंदीमुळे जिल्ह्यातच अडकले आहेत. दवाखान्यातून सुट्टी झाली, तरी त्यांना घरी परत जाता येईना. अशा परिस्थितीत काही दानशूर व्यक्तींकडून होत असलेल्या अन्नदानामुळे या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची भूक भागविली जाते; पण रात्रीच्या वेळी त्यांच्यावर फुटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे.पश्चिम विदर्भातील मेडिकल हब म्हणून अकोल्याची ओळख आहे. म्हणूनच जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील बहुतांश रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अशातच गरीब रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालय वर्दानच ठरत आहे. म्हणूनच दररोज शेकडो रुग्ण येथे उपचारासाठी येतात; पण कोरोनाच्या पृष्ठभूमिवर २६ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी अन् जिल्ह्यांतर्गत सीमा बंदी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे उपचारासाठी आलेले अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक रुग्णालयातच अडकले आहेत. रुग्णांना कसेबसे रुग्णालयात जागा मिळत असली, तरी त्यांच्या नातेवाइकांना फुटपाथवरच दिवस काढावे लागत असल्याचे वास्तव आहे. सीमाबंदी असल्याने गावी परतही जाता येईना; पण अन्नदात्यांच्या मदतीने त्यांच्या पोटाची खडगी भागवण्यास मदत होत आहे. ना निवारा ना अन् आणखी किती दिवस उघड्यावरचे जीवन जगावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या शहरातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक अडकलेअमरावती, बडनेरा, अंजनगाव, नागपूर, हिंगोली यासह जवळपासच्या इतर जिल्ह्यांमधीलही रुग्ण व त्यांचे नातेवाइक सर्वोपचार रुग्णालयातच अडकले असल्याची माहिती आहे.

आस घरवापसीचीउपचारासाठी अकोल्यात आलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक सीमाबंदीमुळे जिल्ह्यात अडकले आहेत. स्वत:चं घर असूनही उघड्यावरचे जीवन जगावं लागत आहे. त्यामुळे ही संचारबंदी अन् सीमाबंदी कधी हटणार अन् आपण घरी कधी जाणार, अशी आस त्यांना लागली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस