शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कोरोना मृतदेह हाताळणाऱ्यांना रोज केवळ ३५० रुपये दाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST

अकोला : कोरोनाने मृत्यू झाला की नातेवाईक आणि मृत व्यक्तीमध्ये दरीच निर्माण होते. कुटुंबीयांना दुरूनच मृतकाला निरोप द्यावा लागतो, ...

अकोला : कोरोनाने मृत्यू झाला की नातेवाईक आणि मृत व्यक्तीमध्ये दरीच निर्माण होते. कुटुंबीयांना दुरूनच मृतकाला निरोप द्यावा लागतो, अशावेळी जीवावर उदार होऊन रुग्णालयातील काही कर्मचारी मृतदेह हाताळण्याचे काम करत आहेत. यासाठी त्यांना चांगलं मानधन मिळत असेल, असे अनेकांना वाटत असेल, मात्र हे कर्मचारी केवळ ३५० रुपये रोजंदारीवर काम करत आहेत. त्यातही या रोजंदारी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेळेवर मानधनही मिळत नसल्याचे वास्तव आहे. सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू होणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. या रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह पॅक करून अंत्यविधीसाठी वॉर्डातून शवविच्छेदनगृहात पाठविण्याचे काम हे कर्मचारी करतात. रोजंदारीवर असलेल्या या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे कंत्राट देण्यात आले आहे. अगदी दिवस-रात्र २४ तास या कामासाठी रोजंदारीवरील हे कंत्राटी कर्मचारी दक्ष असतात. मृतदेह वॉर्डातून शवविच्छेदनगृहात लवकरात लवकर हलविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. हे काम करताना कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाची हाताळणी करावी लागते. त्यामुळे सर्वाधिक खबरदारी या कर्मचाऱ्यांना घ्यावी लागते. पीपीई किट, मास्क, हातमोजे यांचा योग्यप्रकारे वापर करण्यावर भर दिला जातो. घरी गेल्यावर लहान मुले, ज्येष्ठांपासून सध्या थोडे दूर राहण्यालाच प्राधान्य देत असल्याचे काहींनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीने भरलेली पदे

८०

दिवसाला रोजगार

३५०

कंत्राट ३ महिन्यांचे

पोट भरेल एवढेच पैसे, शासनाने आमच्याकडेही पाहावे

मृतदेह पॅक करण्याचे काम करताना पैशांचा कधीही विचार केला नाही. कोरोनासारख्या महामारीत काम मिळाले, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

या कामामुळे महिन्याला किमान नऊ हजार रुपये मिळतात. पोट भरण्यापुरते हे पैसे आहेत, पण त्यापेक्षा आपल्याला या क्षेत्रात काम करता येत आहे, हे अधिक महत्त्वाचे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे काम करण्यासाठी कोणीही सहज पुढे येत नाही, पण आम्ही हे काम करत आहोत. सुरुवातीला भीती वाटत होती, आता नाही. शासनाने आमच्याकडेही पाहावे, अशी अपेक्षाही यावेळी या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

वेतन अधिक मिळावे, ही कोणत्याही क्षेत्रातील कर्मचाऱ्याची इच्छा असते, मात्र हे काम नाही, तर एक जबाबदारी आहे. एकप्रकारे ही रुग्णसेवा असल्याचे या कर्मचाऱ्यांचे मत आहे.

काय असते काम?

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्या रुग्णाचा मृतदेह वॉर्डातून शवागृहात आणला जातो. शवागृहातून मनपातर्फे मृतदेह अंत्यविधीसाठी नेला जातो.

वॉर्डातून मृतदेह आणण्यापूर्वी वॉर्डातच मृतदेह एका विशिष्ट पॅकिंग बॅगमध्ये बंदिस्त केला जातो. हे काम कंत्राटी तत्वावर नेमलेले कर्मचारी करतात. मृतदेह पॅक करुन तेच कर्मचारी मृतदेह शवागृहात नेतात.

मृतदेहांचे पॅकिंग आणि शिफ्टिंग, कामाचे मोल ओळखावे

महिन्याला मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. आजपर्यंत कधी वेतनाचा विचार केला नाही. माणुसकी म्हणूनच हे काम करतो. माझ्याकडून रुग्णसेवा होत आहे, याचा आनंदच. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊनच काम करतो.

- विरेंद्र मिश्रा

हे देखील एकप्रकारे रुग्णसेवेचेच काम आहे. कोरोना संकटाच्या काळात आम्हाला रुग्णसेवेची संधी मिळाली, हे महत्त्वाचे. प्रशासनाने आमच्यासह आमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- आशिष भादुर्गे

सर्वोपचार रुग्णालयात कंत्राटी तत्वावर रोजगार मिळाला. त्यापेक्षा जास्त आनंद रुग्णसेवेचा आहे. सर्वच कंत्राटी सहकारी त्यांची जबाबदारी पार पाडतात, मात्र मानधन वेळेवर मिळत नसल्याने कुटुंबाचा गाडा चालवणे कठीण झाले आहे.

- मंगेश लापुरकार