शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कोरोना : अकोल्याचा मृत्युदर घसरला, पण विदर्भात अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 10:31 IST

CoronaVirus News विदर्भात सर्वात कमी रिकव्हरी रेट ८२.९ टक्के अमरावती, तर ८८.१ टक्के रिकव्हरी रेट अकोला जिल्ह्याचा आहे.

अकोला: गत महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यातील कोविडचा मृत्युदर ३ टक्क्यांहून घसरून २.८ टक्क्यांवर आला आहे. मात्र, मृत्युदराचा हा आकडा विदर्भात सर्वाधिक असल्याचे चित्र दिसून येते. मृत्युदर कमी झाल्याचा दिलासा असला, तरी कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. विदर्भात सर्वात कमी रिकव्हरी रेट ८२.९ टक्के अमरावती, तर ८८.१ टक्के रिकव्हरी रेट अकोला जिल्ह्याचा आहे. वाढती रुग्णसंख्या आणि बरे होण्याचे प्रमाण कमी असल्याने परिस्थिती चिंताजनक होत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात जवळपास सर्वत्रच कोरोना संसर्गाचा वेग मंदावला होता. मात्र, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अकोल्यासह अमरावती, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. गत आठवडाभरापासून कोरोनाने विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात कहर केला. दररोज प्राप्त अहवालाच्या ५० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागल्याने चिंता वाढली. त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले. विदर्भात सर्वात कमी रिकव्हरी रेट ८२.९ टक्के अमरावती जिल्ह्याचा आहे. या दरम्यान अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याचा मृत्युदर घसरून २.८ टक्क्यांवर आल्याने थोडा दिलासा मिळाला. मात्र, हा आकडा विदर्भात अव्वल स्थानी असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेता, प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मागील नऊ महिन्यांत रुग्णसंख्या वाढीमध्ये चढ-उतार झाला, तरी मृत्युदर मात्र ३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मध्यंतरी ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा मृत्युदर २.१६ टक्क्यांवर आला होता. रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे आवश्यक प्रयत्न केले जात असले, तरी परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे.

 

अशी आहे विदर्भातील स्थिती

जिल्हा - बरे होणारे रुग्ण - मृत्युदर (टक्क्यांमध्ये)

अकोला - ८८.१ - २.८

अमरावती- ८२.९ - १.५

भंडारा - ९६.३ - २.३

बुलडाणा - ९१ - १.६

चंद्रपूर - ९६.८ - २

गडचिरोली - ९८ - १

गोंदिया - ९८.१ - १.२

नागपूर - ९३.४ - २.४

वर्धा - ९३.४ - २.६

वाशिम - ९४ - २.१

यवतमाळ - ९१.७ - २.८

नागरिकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कुठलाही आजार अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. वेळेतच कोविडची चाचणी करावी. पॉझिटिव्ह येताच रुग्णालयात दाखल व्हावे. रुग्णसंख्या वाढ आणि मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

- डॉ.राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या