शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:26 IST

गेल्या वर्षभरात कधी नव्हते तेवढे इम्युनिटीचे महत्त्व जगाला पटले आहे. लोकांना आता कळून चुकले आहे की, केवळ कोरोनाच नाही ...

गेल्या वर्षभरात कधी नव्हते तेवढे इम्युनिटीचे महत्त्व जगाला पटले आहे. लोकांना आता कळून चुकले आहे की, केवळ कोरोनाच नाही तर कोणत्याही आजारापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. यामुळेच सध्या लोकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडेंट्स मिळतील असेच पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत.

कच्च्या भाज्या, कडधान्ये...

कोरोनाच्या काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचा वापर वाढला आहे. किचनमधील पदार्थही बदलले आहेत. सध्या आहारात ताज्या फळांचा समावेश जास्त प्रमाणात होत आहे.

यासह आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडेंट्स मिळतील, अशा आहाराचा समावेश वाढत आहे. कच्च्या भाज्या, कडधान्यांचा समावेश करण्यात येत आहे.

बाजारातून विकत आणलेल्या पालेभाज्या, फळे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्याकडे लक्ष दिले जात आहे. यामध्ये किचनमध्ये व्हेजिटेबल क्लिनरचा वापर वाढला आहे. भाजीपाला धुवूनच घेतला जात आहे.

उन्हाळ्यात आंबा, सफरचंद, केळी आणि बीट हे तर खाण्याकडे नागरिकांचा ओढा वाढला. दररोज फळांचा आहारात वापर होत आहे. मोसमी फळांना जास्त पसंती दिली जात आहे.

प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच

कोरोना या काळात हिरव्या भाज्या, रताळे, शेंगदाणे, मका, बाजरी यांचा आहारात उपयोग करावा. राजमामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. राजमाची भाजी नक्की खावी.

दूध हे बऱ्याच पोषक तत्त्वांचे भांडार आहे. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाने दूध पिण्यावर भर द्यावा.

फळांमध्ये ए, बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने फळे खायला पाहिजे.

फास्ट फूडवर अघोषित बंदी

एकीकडे याकडे लक्ष देताना लोकांकडून दुसऱ्या गोष्टीकडे अघोषित बंदी आणली आहे, ती गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे पदार्थ होय. कोरोनाच्या धास्तीने फास्ट फूड पदार्थ टाळण्यात येत आहेत. पाणीपुरी, कचोरी, भेळ, समोसा यांसारखे पदार्थ बाहेरून आणणे टाळत आहेत.

गृहिणी म्हणतात...

कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हेल्दी आहाराचा किचनमध्ये वापर वाढविला आहे. कुटुंबाची काळजी महत्त्वाची आहे.

- भाग्यश्री देशमुख

सध्या सुटी असल्याने मुले सारखा हट्ट करतात. रोज काय करावे, असा प्रश्‍न पडतो. पण मुलांसाठी काहीतरी नवीन करावेच लागते. पाले-भाज्यांचे थालीपीठ तसे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे पदार्थ बनवून देत आहे.

- नम्रता राऊत

घरात मुलांची नेहमीच फर्माईश असते. दररोज काहीतरी चांगले पाहिजे, असा हट्ट असतोच. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण करताना वेळ जातोच. कडधान्याच्या नवीन उसळीचे प्रकार, पुलाव करत आहे.

- लक्ष्मी निकम