शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शेतक-यांच्या कर्जाचे रूपांतरण लवकरच

By admin | Updated: December 4, 2014 01:45 IST

अकोला जिल्ह्यातील १ लाख ११ हजारांवर शेतक-यांना मिळणार लाभ.

संतोष येलकर / अकोलाअल्प पाऊस, हातून गेलेली पिके आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी लागू करण्यात आलेल्या सवलतींमध्येखरीप हंगामात शेतकर्‍यांनी घेतलेल्या पीक कर्जांचे रूपांतरण लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ३९0 शेतकर्‍यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल दीड महिना विलंबाने पावसाने हजेरी लावली. त्यातही अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. सोयाबीन पिकाचे उत्पादनही अत्यल्प झाले असून, काही शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करूनही पेरणीचा खर्चही हाती आला नाही. पावसाअभावी जमिनीतील ओल खोल गेल्याने, रब्बी पिकांचेही खरे नाही. पिके हातून गेल्याच्या स्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ४१ पैसे आहे. शासन निर्णयानुसार खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैसेपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ९९७ गावांमध्ये सहकारी कर्जाचे रूपांतरण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगितीसह विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, या सवलती जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या अधिकार्‍यांना १ डिसेंबर रोजी दिला. त्यानुसार यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विविध बँकांडून काढलेल्या पीक कर्जाचे रूपांतरण लवकरच होणार आहे. त्यानुषंगाने शेतकर्‍यांच्या कर्जाचे रूपांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा सहकारी बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची माहिती मागविण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात विविध बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ३९0 शेतकर्‍यांना कर्ज रूपांतरण या सवलतीचा लाभ मिळणार आहे.