शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शेतक-यांच्या कर्जाचे रूपांतरण लवकरच

By admin | Updated: December 4, 2014 01:45 IST

अकोला जिल्ह्यातील १ लाख ११ हजारांवर शेतक-यांना मिळणार लाभ.

संतोष येलकर / अकोलाअल्प पाऊस, हातून गेलेली पिके आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी लागू करण्यात आलेल्या सवलतींमध्येखरीप हंगामात शेतकर्‍यांनी घेतलेल्या पीक कर्जांचे रूपांतरण लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ३९0 शेतकर्‍यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल दीड महिना विलंबाने पावसाने हजेरी लावली. त्यातही अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. सोयाबीन पिकाचे उत्पादनही अत्यल्प झाले असून, काही शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करूनही पेरणीचा खर्चही हाती आला नाही. पावसाअभावी जमिनीतील ओल खोल गेल्याने, रब्बी पिकांचेही खरे नाही. पिके हातून गेल्याच्या स्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ४१ पैसे आहे. शासन निर्णयानुसार खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैसेपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ९९७ गावांमध्ये सहकारी कर्जाचे रूपांतरण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगितीसह विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, या सवलती जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या अधिकार्‍यांना १ डिसेंबर रोजी दिला. त्यानुसार यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विविध बँकांडून काढलेल्या पीक कर्जाचे रूपांतरण लवकरच होणार आहे. त्यानुषंगाने शेतकर्‍यांच्या कर्जाचे रूपांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा सहकारी बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची माहिती मागविण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात विविध बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ३९0 शेतकर्‍यांना कर्ज रूपांतरण या सवलतीचा लाभ मिळणार आहे.