शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बंजारा संस्कृतीतील विचारधनास ग्रंथरूप देण्यासाठीच संमेलन

By admin | Updated: February 1, 2016 02:12 IST

बंजारा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांचे प्रतिपादन.

वाशिम : बंजारा समाजाची संस्कृती प्राचीन असून, मौखिक स्वरूपात आहे. तांडा संस्कृती ही आतापर्यंत केवळ मौखिक स्वरूपात होती, ती पुस्तकबद्ध होऊन लिखित स्वरूपात यावी, याकरिता ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्राच्यावतीने अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांनी रविवारी येथे व्यक्त केले. अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचे आयोजन वाशिम येथील विठ्ठलवाडीत ६ व ७ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले. या संमेलनाची माहिती देण्याकरिता रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून संमेलनाचे अध्यक्ष औरंगाबाद येथील प्राचार्य गबरूसिंग चव्हाण, स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, सुभाष राठोड, आर. डी. राठोड, एन. टी. जाधव, अँड. जगदीश पवार, प्रेम राठोड, प्रा. विजय राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ टी. सी. राठोड म्हणाले, की राष्ट्रीय स्तरावरील वाशिम येथे होणारे हे पहिले संमेलन आहे. समाजातील साहित्यिकांना एक पीठ निर्माण व्हावे, याकरिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा समाजाच्या अतिप्राचीन संस्कृतीवर प्रकाशझोत टाकून आजच्या तरुणांना या सांस्कृतिक वारशाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्ती करण्यात येणार असल्याचे गबरूसिंग चव्हाण म्हणाले. बंजारा समाज हा तांड्यात राहणार आहे. तसेच श्रमीक संस्कृतीचा उपासक आहे. येथे मातृसत्ताक संस्कृती होती. नवीन संशोधकांनी याचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. या संमेलनात देशातील आठ ते नऊ राज्यांतील साहित्यिकांचा सहभाग राहणार आहे. पत्रकार परिषदेचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विजय जाधव यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा संमेलनात ६ फेब्रुवारी राजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी पोहरादेवी येथील संत रामराव महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर १0.३0 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य गबरूसिंह राठोड राहणार आहेत. स्वागताध्यक्ष एआयबीएसएसचे राज्य अध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड आहेत. उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार मनोहर नाईक करतील. प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, लक्ष्मणराव गायकवाड, भिमणीपुत्र मोहन नाईक यांची राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल राज्यमंत्री संजय राठोड, एआयबीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. शंकर नाईक, तेलंगणातील खासदार सीताराम नाईक, एआयबीएसएसचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष राजूसिंह नाईक, आ. हरिभाऊ राठोड, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मखराम पवार, किनवटचे आमदार प्रदीप नाईक, एआयबीएसएसचे कार्यकारी अध्यक्ष अमरसिंह तिलावत, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांचा सामावेश राहणार आहे. दुपारी २ वाजता ह्यबंजारा साहित्य प्रेरणा - दशा, दिशा और स्वरूपह्ण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर ४ वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी रोजी ह्यबंजारा समाज के महामानवों का मानवतावादी दृष्टिकोनह्ण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता ह्यबंजारा समाज की वर्तमान समस्याएं एवम् उपायह्ण यावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ५ वाजता समारोप होणार असून, अध्यक्षस्थानी राजाराम जाधव राहणार आहेत.