शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

बंजारा संस्कृतीतील विचारधनास ग्रंथरूप देण्यासाठीच संमेलन

By admin | Updated: February 1, 2016 02:12 IST

बंजारा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांचे प्रतिपादन.

वाशिम : बंजारा समाजाची संस्कृती प्राचीन असून, मौखिक स्वरूपात आहे. तांडा संस्कृती ही आतापर्यंत केवळ मौखिक स्वरूपात होती, ती पुस्तकबद्ध होऊन लिखित स्वरूपात यावी, याकरिता ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्राच्यावतीने अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांनी रविवारी येथे व्यक्त केले. अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचे आयोजन वाशिम येथील विठ्ठलवाडीत ६ व ७ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले. या संमेलनाची माहिती देण्याकरिता रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून संमेलनाचे अध्यक्ष औरंगाबाद येथील प्राचार्य गबरूसिंग चव्हाण, स्वागताध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, सुभाष राठोड, आर. डी. राठोड, एन. टी. जाधव, अँड. जगदीश पवार, प्रेम राठोड, प्रा. विजय राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ टी. सी. राठोड म्हणाले, की राष्ट्रीय स्तरावरील वाशिम येथे होणारे हे पहिले संमेलन आहे. समाजातील साहित्यिकांना एक पीठ निर्माण व्हावे, याकरिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बंजारा समाजाच्या अतिप्राचीन संस्कृतीवर प्रकाशझोत टाकून आजच्या तरुणांना या सांस्कृतिक वारशाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्ती करण्यात येणार असल्याचे गबरूसिंग चव्हाण म्हणाले. बंजारा समाज हा तांड्यात राहणार आहे. तसेच श्रमीक संस्कृतीचा उपासक आहे. येथे मातृसत्ताक संस्कृती होती. नवीन संशोधकांनी याचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. या संमेलनात देशातील आठ ते नऊ राज्यांतील साहित्यिकांचा सहभाग राहणार आहे. पत्रकार परिषदेचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विजय जाधव यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा संमेलनात ६ फेब्रुवारी राजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी पोहरादेवी येथील संत रामराव महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर १0.३0 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य गबरूसिंह राठोड राहणार आहेत. स्वागताध्यक्ष एआयबीएसएसचे राज्य अध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड आहेत. उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार मनोहर नाईक करतील. प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, लक्ष्मणराव गायकवाड, भिमणीपुत्र मोहन नाईक यांची राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल राज्यमंत्री संजय राठोड, एआयबीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. शंकर नाईक, तेलंगणातील खासदार सीताराम नाईक, एआयबीएसएसचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष राजूसिंह नाईक, आ. हरिभाऊ राठोड, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मखराम पवार, किनवटचे आमदार प्रदीप नाईक, एआयबीएसएसचे कार्यकारी अध्यक्ष अमरसिंह तिलावत, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांचा सामावेश राहणार आहे. दुपारी २ वाजता ह्यबंजारा साहित्य प्रेरणा - दशा, दिशा और स्वरूपह्ण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर ४ वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी रोजी ह्यबंजारा समाज के महामानवों का मानवतावादी दृष्टिकोनह्ण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता ह्यबंजारा समाज की वर्तमान समस्याएं एवम् उपायह्ण यावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ५ वाजता समारोप होणार असून, अध्यक्षस्थानी राजाराम जाधव राहणार आहेत.