शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा बालेकिल्ला झाला भाजपचा गड

By admin | Updated: May 17, 2014 19:21 IST

भाजपच्या मतात ८ टक्क्यांनी वाढ, काँग्रेसचाही टक्का वाढला तर भारिपचा घटला

अकोला : स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघाला १९८९ साली भाजपने खिंडार पाडले. तेव्हापासून तर आतापर्यंत या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळविता आला नसून, अकोला आता भाजपचा गड झाला आहे. भाजपचे संजय धोत्रे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली असून, २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपची मते आठ टक्क्यांनी वाढली असून, भारिपची मते सहा टक्क्यांनी घटली आहेत. १९५२ पासून १९८९ पर्यंत अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार विजयी होत होता. मात्र, १९८९ मध्ये भाजपचे पांडुरंग फुंडकर या मतदारसंघात विजयी झाले व तेव्हापासून या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. १९९८ व १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी विजय मिळविला होता. या दोन्ही निवडणुकांमध्ये भारिपने काँग्रेससोबत आघाडी केली होती. त्यानंतर मात्र, २००४ साली काँग्रेस व भारिप वेगवेगळ्या निवडणुका लढले. तसेच भाजपचे मूर्तिजापूरचे आमदार असलेले संजय धोत्रे यांनी उमेदवारी दिली. संजय धोत्रे यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे लक्ष्मणराव तायडे यांचा १ लाख ६० हजार ७४ एवढ्या मताधिक्याने पराभव केला. यावेळी संजय धोत्रे यांना ३१३३२३ मते मिळाली होती तर लक्ष्मणराव तायडे यांना २०६९५२ मते, ॲड. प्रकाश आंबेडकर यांना १८७२०२ मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेस दुसर्‍या तर भारिप तिसर्‍या क्रमांकावर होती. त्यानंतर झालेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही भाजपचे संजय धोत्रे यांनी ६४ हजार ८४८ मतांनी विजय मिळविला. यावेळी त्यांनी भारिपचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला तर काँग्रेसचे बाबासाहेब धाबेकर यांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत संजय धोत्रे यांना २८७५२६ मते, प्रकाश आंबेडकर यांना २२२६७८ मते तर बाबासाहेब धाबेकर यांना १८२७७६ मते मिळाली होती. या निवडणुकीत संजय धोत्रे यांना ३८.९१ टक्के मते मिळाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत यामध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाली असून, धोत्रे यांना ४६.९४ टक्के मते मिळाली आहेत.