शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीला सुरुंग; निधीचे ‘चाॅकलेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST

सूर्य उगवला म्हणजे ताे मावळणारच या उक्तीनुसार महापालिकेत आजवर एकतर्फी निर्णय घेणाऱ्या सत्ताधारी भाजपला राज्य शासनाने ठराव रद्द करून ...

सूर्य उगवला म्हणजे ताे मावळणारच या उक्तीनुसार महापालिकेत आजवर एकतर्फी निर्णय घेणाऱ्या सत्ताधारी भाजपला राज्य शासनाने ठराव रद्द करून जागेवर आणले असले तरीही भाजपने निधी वाटपाचे ‘चाॅकलेट’ देत विराेधी पक्षांनाच सुरूंग लावल्याचे समाेर आले आहे. सुवर्ण जयंती नगराेत्थान, नागरी दलित वस्ती सुधार याेजनेसह इतरही मनपा निधीतून भरीव मदत करण्याचे आश्वासन काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना देण्याची खेळी सत्तापक्षाने केली आहे. सेनेचे काही नगरसेवकही भाजप पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

राज्यात २०१४ मध्ये युती सरकारच्या कालावधीत महापाैरपद भाजपच्या तर उपमहापाैरपद सेनेच्या वाट्याला आले. परंतु या दरम्यान शहरातील विकासकामांचे निर्णय असाे वा राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून विकासकामांचे भूमिपूजन असाे या दाेन्ही विषयांपासून भाजपने सेनेचे लाेकप्रतिनीधी, पदाधिकारी व नगरसेवकांना बाजूला सारले. मनातली ही खदखद २०१९ मधील लाेकसभा निवडणुकीच्या सभेत शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी जाहीरपणे बाेलून व्यक्त केली हाेती. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात माेठा फेरबदल हाेऊन शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसाेबत घराेबा केल्याचा परिणाम मनपाच्या राजकारणावर झाल्याचे दिसून येत आहे. गत काही महिन्यांपासून सत्तापक्षाच्या निर्णयाविराेधात राष्ट्रवादीचे नगरसेवक वगळता सेना, काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता तसेच भविष्यात प्रभाग रचनेमुळे शहरात राजकीय उलथापालथ हाेणार हे गृहीत धरून भाजपने निधी वाटपाच्या माध्यमातून विराेधकांनाच सुरूंग लावल्याचे समाेर आले आहे.

विराेधी पक्षातील नगरसेवक संपर्कात

मनपाची २०२२मध्ये निवडणूक हाेइल. त्यापूर्वी प्रभाग रचना हाेऊन वॉर्ड उदयास येतील. एका वॉर्डात एक किंवा दाेन सदस्य निवडणूक लढतील. ही रचना भाजपसाठी अनुकूल नसल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे आतापासूनच भाजपने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीतील काही नगरसेवकांना विकासकामांच्या बाबतीत ‘ऑफर’ दिल्याची माहिती आहे.

एमआयएमला खतपाणी

मनपात काँग्रेसचे १३ नगरसेवक असून यापैकी १२ नगरसेवक उत्तर झाेनमधून निवडून आले आहेत. यापैकी एक नगरसेवक जुने शहरातील प्रभाग १७ मध्ये आहे. काँग्रेसला पाेषक ठरणाऱ्या प्रभागात एमआयएमला खतपाणी घालण्याचे काम काही राजकीय पक्षांनी सुरू केल्याचे बाेलले जात आहे.