शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पक्ष निधीवरून कॉँग्रेसमध्ये नाराजी!

By admin | Updated: November 6, 2014 00:50 IST

अकोल्यातील स्थानिक काँग्रेस पदाधिका-यांचा दावा.

अकोला: कॉँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी निवडणुकीत अनेक उमेदवारांना पैसे (पक्षनिधी) व अन्य रसद पोहोचली नसल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता निवडणुकीत जिल्ह्यातील कॉँग्रेस उमेदवारांना पक्षनिधी अल्प प्रमाणात मिळाल्याची बाब समोर आली आहे. पक्षनिधीवरून जिल्ह्यात नाराजी पसरली असून, अल्पनिधीचा परिणाम प्रचारावर झाला होता, असा दावाही आता पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांकडून होत आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी कॉँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. सर्वात जास्त रस्सीखेच अकोला पश्‍चिम मतदारसंघात झाली होती. अकोला पश्‍चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी कॉँग्रेसमधील एका गटाने ह्यपॅनलह्ण तयार केले होते. या पॅनलमधील सदस्यांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र पॅनलमधील सदस्याला उमेदवारी मिळाली नाही. दरम्यान, निवडणुकीत जागा वाटपावरून क ॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही मतदारसंघातून उमेदवार उभे केले. अकोला पश्‍चिम मतदारसंघातून उषा विरक, मूर्तिजापूर मतदारसंघातून श्रावण इंगळे, आकोटमधून महेश गणगणे, बाळापूरमधून सैय्यद नातिकोउद्दिन खतीब आणि अकोला पूर्वमधून डॉ. सुभाष कोरपे यांनी निवडणूक लढविली. ऐन प्रचाराच्या काळात कॉँग्रेसमध्ये निलंबन आणि राजीमान्याचे नाट्य रंगले . १0 पेक्षा आजी-माजी पदाधिकार्‍यांवर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे युवक कॉँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले होते. जिल्ह्यात कॉँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक आणि पृथ्वीराज चव्हाण वगळता राज्यातील अन्य नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. निवडणुकीत कॉँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता कॉँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्रच सुरू झाले. निवडणुकीत उमेदवारांना देण्यात येणार्‍या पक्षनिधीवरून आरोपास सुरुवात झाली आहे. उमेदवारांना अल्प निधी मिळाला होता. याबाबत अकोला पूर्वमधून निवडणूक लढविलेले डॉ. सुभाष कोरपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षनिधीबाबत बोलण्यास नकार दिला.