शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अवास योजनेत कामगिरीचे अभिनंदन; पण ‘वंचितां’ना घरकुल द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:40 IST

अकोला : महाआवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अकोला जिल्हा परिषदेला अमरावती विभागातून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित ...

अकोला : महाआवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अकोला जिल्हा परिषदेला अमरावती विभागातून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल अकोला जिल्हा परिषदेचे अभिनंदन; पण आवास योजनेच्या ऑनलाइन सर्व्हेत विविध त्रुटींमुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील २१ हजार खऱ्या लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्याचा मुद्दा सत्ता पक्षाकडून जिल्हा परिषद स्थायी समितीच्या तहकूब सभेत मंगळवारी मांडण्यात आला.

जिल्हा परिषद स्थायी समितीची ऑनलाइन सभा २७ ऑगस्ट रोजी तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब सभा ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आली. महाअवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)मध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अकोला जिल्हा परिषदेने अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. विभागातून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने अकोला जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आल्याने, जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले. परंतु अभिनंदन करतानाच आवास योजनेच्या ऑनलाइन सर्व्हेमध्ये विविध त्रुटीच्या कारणामुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील २१ हजार पात्र लाभार्थींना तातडीने घरकुलाचा लाभ देण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत मांडला. त्यानुसार यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ऑनलाइन सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल दातकर, डाॅ. प्रशांत अढाऊ, गजानन पुंडकर, चंद्रशेखर चिंचोळकर, रायसिंग राठोड, प्रकाश आतकड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अखेर सभेच्या शेवटी

इतिवृत्ताला मंजुरी !

जिल्हा परिषद स्थायी समितीच्या २७ ऑगस्ट रोजीच्या ऑनलाइन सभेत समितीच्या मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याची मागणी विरोधी गटाच्या सदस्यांनी लावून धरली होती. त्यामुळे झालेल्या गोंधळात समितीची सभा तहकूब करण्यात आली होती. ३१ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या तहकूब सभेत मात्र सभेच्या शेवटी मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली.