शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अवास योजनेत कामगिरीचे अभिनंदन; पण ‘वंचितां’ना घरकुल द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:40 IST

अकोला : महाआवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अकोला जिल्हा परिषदेला अमरावती विभागातून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित ...

अकोला : महाआवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अकोला जिल्हा परिषदेला अमरावती विभागातून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल अकोला जिल्हा परिषदेचे अभिनंदन; पण आवास योजनेच्या ऑनलाइन सर्व्हेत विविध त्रुटींमुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील २१ हजार खऱ्या लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्याचा मुद्दा सत्ता पक्षाकडून जिल्हा परिषद स्थायी समितीच्या तहकूब सभेत मंगळवारी मांडण्यात आला.

जिल्हा परिषद स्थायी समितीची ऑनलाइन सभा २७ ऑगस्ट रोजी तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब सभा ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन पध्दतीने घेण्यात आली. महाअवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)मध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अकोला जिल्हा परिषदेने अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. विभागातून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने अकोला जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आल्याने, जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले. परंतु अभिनंदन करतानाच आवास योजनेच्या ऑनलाइन सर्व्हेमध्ये विविध त्रुटीच्या कारणामुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील २१ हजार पात्र लाभार्थींना तातडीने घरकुलाचा लाभ देण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत मांडला. त्यानुसार यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ऑनलाइन सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल दातकर, डाॅ. प्रशांत अढाऊ, गजानन पुंडकर, चंद्रशेखर चिंचोळकर, रायसिंग राठोड, प्रकाश आतकड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अखेर सभेच्या शेवटी

इतिवृत्ताला मंजुरी !

जिल्हा परिषद स्थायी समितीच्या २७ ऑगस्ट रोजीच्या ऑनलाइन सभेत समितीच्या मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याची मागणी विरोधी गटाच्या सदस्यांनी लावून धरली होती. त्यामुळे झालेल्या गोंधळात समितीची सभा तहकूब करण्यात आली होती. ३१ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या तहकूब सभेत मात्र सभेच्या शेवटी मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली.