शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

कागदपत्रांचा गोंधळ थांबला, जीवनदायीचे उपचार सुलभ

By admin | Updated: June 30, 2014 02:23 IST

योजनेत बदल: शिधा पत्रिकेची अट शिथिल

सचिन राऊत / अकोलागोरगरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभासाठी उपचाराआधी रुग्णांमागे असलेली कागदपत्रांच्या पूर्ततेची कटकट थांबली आहे. जीवनदायीच्या लाभासाठी कागदपत्रांच्या सोबतच आरोग्य पत्र बंधनकारक करण्यात आले होते; मात्र या कागदपत्रांमुळे गोंधळ उडाल्याने आणि रुग्णांसाठी या योजनेचा लाभ घेणे अडचणीचे ठरत असल्याने शिधापत्रिकेची अट शिथिल करण्यात आली असून, आरोग्य पत्रही काही कालावधीनंतर देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणे रुग्णांसाठी आता सरळ झाले आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना संबंधित रुग्णालयामध्ये आधी आरोग्य पत्र जमा करणे व ३१ ऑक्टोबर २0१३ पूर्वी काढलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच या योजेनेचा लाभ देण्यात येत होता. एखाद्याचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे आणि त्याची शिधापत्रिका ३१ ऑक्टोबर २0१३ नंतरची आहे किंवा आरोग्य पत्र अद्याप प्राप्त झाले नाही अशा गोरगरिबांना या योजनेपासून वंचित ठेवल्या जात होते. त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये वाद उद्भवले आहेत. रुग्णालयामध्ये सादर करावयाच्या शिधापत्रिकेच्या कालावधीचा गोंधळ आणि आरोग्य पत्रासोबतच इतर कागदपत्रांमुळे योजना वादग्रस्त ठरत असल्याचे दिसून येत होते; मात्र राज्य शासनाने आता रुग्णांना या योजनेचा लाभ विना कटकट करून देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रुग्णांना केवळ एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र आणि कुठलीही शिधापत्रिका सादर करावी लागणार आहे. यासोबतच काही दिवसांनंतर आरोग्य पत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना या योजनेचा लाभ घेणे अधिक सोयीचे झाले आहे. ही अट शिथिल करण्यात आल्याने रुग्णांची ससेहोलपट थांबणार असून, या योजनेतील अडचणीही दूर करण्यात आल्या आहेत.