शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कागदपत्रांचा गोंधळ थांबला, जीवनदायीचे उपचार सुलभ

By admin | Updated: June 30, 2014 02:23 IST

योजनेत बदल: शिधा पत्रिकेची अट शिथिल

सचिन राऊत / अकोलागोरगरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभासाठी उपचाराआधी रुग्णांमागे असलेली कागदपत्रांच्या पूर्ततेची कटकट थांबली आहे. जीवनदायीच्या लाभासाठी कागदपत्रांच्या सोबतच आरोग्य पत्र बंधनकारक करण्यात आले होते; मात्र या कागदपत्रांमुळे गोंधळ उडाल्याने आणि रुग्णांसाठी या योजनेचा लाभ घेणे अडचणीचे ठरत असल्याने शिधापत्रिकेची अट शिथिल करण्यात आली असून, आरोग्य पत्रही काही कालावधीनंतर देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणे रुग्णांसाठी आता सरळ झाले आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना संबंधित रुग्णालयामध्ये आधी आरोग्य पत्र जमा करणे व ३१ ऑक्टोबर २0१३ पूर्वी काढलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच या योजेनेचा लाभ देण्यात येत होता. एखाद्याचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे आणि त्याची शिधापत्रिका ३१ ऑक्टोबर २0१३ नंतरची आहे किंवा आरोग्य पत्र अद्याप प्राप्त झाले नाही अशा गोरगरिबांना या योजनेपासून वंचित ठेवल्या जात होते. त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये वाद उद्भवले आहेत. रुग्णालयामध्ये सादर करावयाच्या शिधापत्रिकेच्या कालावधीचा गोंधळ आणि आरोग्य पत्रासोबतच इतर कागदपत्रांमुळे योजना वादग्रस्त ठरत असल्याचे दिसून येत होते; मात्र राज्य शासनाने आता रुग्णांना या योजनेचा लाभ विना कटकट करून देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रुग्णांना केवळ एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र आणि कुठलीही शिधापत्रिका सादर करावी लागणार आहे. यासोबतच काही दिवसांनंतर आरोग्य पत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना या योजनेचा लाभ घेणे अधिक सोयीचे झाले आहे. ही अट शिथिल करण्यात आल्याने रुग्णांची ससेहोलपट थांबणार असून, या योजनेतील अडचणीही दूर करण्यात आल्या आहेत.