शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

ग्रामीण भागातील परिस्थिती सुधारली, मनपा क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:14 IST

जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे बरे ...

जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. ही बाब अकोलेकरांसाठी दिलासादायक आहे. जिल्ह्यात मागील सात दिवसांत दोघांचा मृत्यू, तर ४६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तालुकानिहाय रुग्णांच्या आकड्यांचा विचार केल्यास दोन्ही मृत्यू हे अकोला तालुक्यातील आहे. सर्वात कमी पॉझिटिव्ह रुग्ण हे बार्शिटाकळी तालुक्यात केवळ ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात असली, तरी त्या तुलनेने महापालिका क्षेत्रातील चिंता कायम आहे. नागरिकांनी योग्य खबरदारी घेतल्यास नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात कमी दिसून येईल.

तालुकानिहाय रुग्णसंख्या

मृत्यू - तालुका - रुग्ण

० - अकोट - ०७

० - बाळापूर - ०४

० - मूर्तिजापूर - ०७

० - बार्शिटाकळी - ०३

० - तेल्हारा - ०४

२ - अकोला - २१ (ग्रामीण -०६, मनपा-१५)

सात दिवसांत ग्रामीण भागात एकही मृत्यू नाही

जिल्ह्यातील कोविडची रुग्णसंख्या वाढ नियंत्रणात आली असून, मृत्यूचा वाढता आकडाही नियंत्रणात येत आहे. मागील सात दिवसांत ग्रामीण भागात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आठवडाभरात दोघांचा मृत्यू झाला असून, ते मनपा क्षेत्रातील असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात कोविडची परिस्थिती नियंत्रणात येत आहे, मात्र कोरोना संसर्गाचा धोका अजूनही टळलेला नाही. नागरिकांनी यापुढेही आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, नियमित हात धुणे आणि इतरांपासून सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करावे.

- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला