शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना जाचक अटी अन् वेतन आयोग लागू करताना मात्र...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 14:58 IST

अकोला लोकसभा मतदारसंघात येणाºया मेडशी आणि मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक प्रवासी आणि त्यांच्यासोबत सुरू झाला राजकीय गप्पांचा फड.

- नितीन गव्हाळे

अकोला: मंगळवारची सकाळची ११.३0 वाजताची वेळ...नवीन बसस्थानक...पुसद-अनसिंग-वाशिम बसगाडी पातूर-मेडशी-मालेगाव मार्गे धावायला लागली. प्रवास सुरू झाला. बसगाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली...अकोला लोकसभा मतदारसंघात येणाºया मेडशी आणि मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक प्रवासी आणि त्यांच्यासोबत सुरू झाला राजकीय गप्पांचा फड.मालेगाव तालुक्यातील पांग्री नवघरे येथील शेतकरी अशोक नवघरे यांनी, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कर्जमाफी देताना, शासनाने अटी लादल्या. किसान सन्मान निधी योजनेची रक्कम फार कमी लोकांच्या खात्यात जमा झाली. शेतकºयांचे भले करायचे असेल तर सिंचनाची सुविधा, हमीभाव, सरसकट कर्जमाफी देणारे सरकार निवडून येण्याची गरज आहे. थापा मारणारे नकोत, असे मतही नवघरे यांनी व्यक्त केले. वाशिम येथील शेतकरी नारायण आरू यांनी मोदी सरकारवर तोंडसुखच घेतले. ते म्हणाले, आधी बॅलेटपेपरने मतदान घ्यावे. अन्यथा लोकशाहीची हत्या होईल. अशी भीतीच त्यांनी व्यक्त केली. महागाई वाढली. दरवर्षी रासायनिक खते, औषधांचे भाव वाढतात; परंतु शेतमालाचे भाव वाढत नाही. शेतकºयांचा सन्मान करणारे सरकार हवे असल्याचे मत त्यांनी मांडले. मालेगावची विद्यार्थिनी मीनाक्षी व्यवहारे हिने, विकासाच्या बाबतीत मालेगाव, रिसोड भाग मागासलेला आहे. उच्च शिक्षणाची सोय नाही. सरकारने विकासकामे केली खरी; परंतु आम्हा युवकांना रोजगार मात्र उपलब्ध करून दिला नाही. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे मत तिने व्यक्त केले. मालेगावाचे अमोल केंद्रे याने भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार, दहशतवाद कमी झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची चांगली प्रतिमा मोदींनी निर्माण केल्याचे मत व्यक्त केले. रिसोडचे उत्तमराव बोडखे यांनी, कोणतेही सरकार आले तरी फार बदल होणार नाही, असे मत मांडले. रिसोडचे अरुण मगर यांनी, रोजगार उपलब्ध करणारे, उद्योगधंद्यांना चालना देणारे सरकार सत्तेत यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाजप सरकार हे शेटजी-भटजींचे

मालेगाव तालुक्यातील दहीगावचे नंदू गव्हांदे यांनी, भाजप सरकार हे शेटजी-भटजींचे आहे. गरिबांचे सरकार नाही. शेतकऱ्यांचे तर मुळीच नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. पिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांचे भले करणारे सरकार सत्तेत यावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मालेगावच्या माया इंगोले यांनी, सरकारने रस्ते, दिवाबत्तीची सोय केली. मतदारसंघात आरोग्याच्या सुविधा नाही. त्या उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

खते, औषधे महागतात, मग शेतमालाचे भाव का वाढत नाहीत?दरवर्षी पेरणीचा हंगाम आला की, रासायनिक खते, फवारणीची औषधे महागतात; परंतु दर वर्षाला शेतमालाचे भाव वाढत नाहीत. जोपर्यंत शेतमालाला सन्मानजनक दर मिळत नाही. तोपर्यंत शेतकरी आणि शेतीचा विकास होणार नसल्याचे मत मोपचे राजू खरडे यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोला