शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
5
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
6
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
7
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
8
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
9
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
10
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
11
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
12
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
13
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
14
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
15
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
16
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
17
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
18
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
19
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
20
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार

शेतकऱ्यांना जाचक अटी अन् वेतन आयोग लागू करताना मात्र...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 14:58 IST

अकोला लोकसभा मतदारसंघात येणाºया मेडशी आणि मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक प्रवासी आणि त्यांच्यासोबत सुरू झाला राजकीय गप्पांचा फड.

- नितीन गव्हाळे

अकोला: मंगळवारची सकाळची ११.३0 वाजताची वेळ...नवीन बसस्थानक...पुसद-अनसिंग-वाशिम बसगाडी पातूर-मेडशी-मालेगाव मार्गे धावायला लागली. प्रवास सुरू झाला. बसगाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली...अकोला लोकसभा मतदारसंघात येणाºया मेडशी आणि मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक प्रवासी आणि त्यांच्यासोबत सुरू झाला राजकीय गप्पांचा फड.मालेगाव तालुक्यातील पांग्री नवघरे येथील शेतकरी अशोक नवघरे यांनी, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कर्जमाफी देताना, शासनाने अटी लादल्या. किसान सन्मान निधी योजनेची रक्कम फार कमी लोकांच्या खात्यात जमा झाली. शेतकºयांचे भले करायचे असेल तर सिंचनाची सुविधा, हमीभाव, सरसकट कर्जमाफी देणारे सरकार निवडून येण्याची गरज आहे. थापा मारणारे नकोत, असे मतही नवघरे यांनी व्यक्त केले. वाशिम येथील शेतकरी नारायण आरू यांनी मोदी सरकारवर तोंडसुखच घेतले. ते म्हणाले, आधी बॅलेटपेपरने मतदान घ्यावे. अन्यथा लोकशाहीची हत्या होईल. अशी भीतीच त्यांनी व्यक्त केली. महागाई वाढली. दरवर्षी रासायनिक खते, औषधांचे भाव वाढतात; परंतु शेतमालाचे भाव वाढत नाही. शेतकºयांचा सन्मान करणारे सरकार हवे असल्याचे मत त्यांनी मांडले. मालेगावची विद्यार्थिनी मीनाक्षी व्यवहारे हिने, विकासाच्या बाबतीत मालेगाव, रिसोड भाग मागासलेला आहे. उच्च शिक्षणाची सोय नाही. सरकारने विकासकामे केली खरी; परंतु आम्हा युवकांना रोजगार मात्र उपलब्ध करून दिला नाही. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे मत तिने व्यक्त केले. मालेगावाचे अमोल केंद्रे याने भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार, दहशतवाद कमी झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची चांगली प्रतिमा मोदींनी निर्माण केल्याचे मत व्यक्त केले. रिसोडचे उत्तमराव बोडखे यांनी, कोणतेही सरकार आले तरी फार बदल होणार नाही, असे मत मांडले. रिसोडचे अरुण मगर यांनी, रोजगार उपलब्ध करणारे, उद्योगधंद्यांना चालना देणारे सरकार सत्तेत यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाजप सरकार हे शेटजी-भटजींचे

मालेगाव तालुक्यातील दहीगावचे नंदू गव्हांदे यांनी, भाजप सरकार हे शेटजी-भटजींचे आहे. गरिबांचे सरकार नाही. शेतकऱ्यांचे तर मुळीच नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. पिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांचे भले करणारे सरकार सत्तेत यावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मालेगावच्या माया इंगोले यांनी, सरकारने रस्ते, दिवाबत्तीची सोय केली. मतदारसंघात आरोग्याच्या सुविधा नाही. त्या उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

खते, औषधे महागतात, मग शेतमालाचे भाव का वाढत नाहीत?दरवर्षी पेरणीचा हंगाम आला की, रासायनिक खते, फवारणीची औषधे महागतात; परंतु दर वर्षाला शेतमालाचे भाव वाढत नाहीत. जोपर्यंत शेतमालाला सन्मानजनक दर मिळत नाही. तोपर्यंत शेतकरी आणि शेतीचा विकास होणार नसल्याचे मत मोपचे राजू खरडे यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोला