शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

शेतकऱ्यांना जाचक अटी अन् वेतन आयोग लागू करताना मात्र...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 14:58 IST

अकोला लोकसभा मतदारसंघात येणाºया मेडशी आणि मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक प्रवासी आणि त्यांच्यासोबत सुरू झाला राजकीय गप्पांचा फड.

- नितीन गव्हाळे

अकोला: मंगळवारची सकाळची ११.३0 वाजताची वेळ...नवीन बसस्थानक...पुसद-अनसिंग-वाशिम बसगाडी पातूर-मेडशी-मालेगाव मार्गे धावायला लागली. प्रवास सुरू झाला. बसगाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली...अकोला लोकसभा मतदारसंघात येणाºया मेडशी आणि मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक प्रवासी आणि त्यांच्यासोबत सुरू झाला राजकीय गप्पांचा फड.मालेगाव तालुक्यातील पांग्री नवघरे येथील शेतकरी अशोक नवघरे यांनी, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कर्जमाफी देताना, शासनाने अटी लादल्या. किसान सन्मान निधी योजनेची रक्कम फार कमी लोकांच्या खात्यात जमा झाली. शेतकºयांचे भले करायचे असेल तर सिंचनाची सुविधा, हमीभाव, सरसकट कर्जमाफी देणारे सरकार निवडून येण्याची गरज आहे. थापा मारणारे नकोत, असे मतही नवघरे यांनी व्यक्त केले. वाशिम येथील शेतकरी नारायण आरू यांनी मोदी सरकारवर तोंडसुखच घेतले. ते म्हणाले, आधी बॅलेटपेपरने मतदान घ्यावे. अन्यथा लोकशाहीची हत्या होईल. अशी भीतीच त्यांनी व्यक्त केली. महागाई वाढली. दरवर्षी रासायनिक खते, औषधांचे भाव वाढतात; परंतु शेतमालाचे भाव वाढत नाही. शेतकºयांचा सन्मान करणारे सरकार हवे असल्याचे मत त्यांनी मांडले. मालेगावची विद्यार्थिनी मीनाक्षी व्यवहारे हिने, विकासाच्या बाबतीत मालेगाव, रिसोड भाग मागासलेला आहे. उच्च शिक्षणाची सोय नाही. सरकारने विकासकामे केली खरी; परंतु आम्हा युवकांना रोजगार मात्र उपलब्ध करून दिला नाही. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे मत तिने व्यक्त केले. मालेगावाचे अमोल केंद्रे याने भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार, दहशतवाद कमी झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची चांगली प्रतिमा मोदींनी निर्माण केल्याचे मत व्यक्त केले. रिसोडचे उत्तमराव बोडखे यांनी, कोणतेही सरकार आले तरी फार बदल होणार नाही, असे मत मांडले. रिसोडचे अरुण मगर यांनी, रोजगार उपलब्ध करणारे, उद्योगधंद्यांना चालना देणारे सरकार सत्तेत यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाजप सरकार हे शेटजी-भटजींचे

मालेगाव तालुक्यातील दहीगावचे नंदू गव्हांदे यांनी, भाजप सरकार हे शेटजी-भटजींचे आहे. गरिबांचे सरकार नाही. शेतकऱ्यांचे तर मुळीच नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. पिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांचे भले करणारे सरकार सत्तेत यावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मालेगावच्या माया इंगोले यांनी, सरकारने रस्ते, दिवाबत्तीची सोय केली. मतदारसंघात आरोग्याच्या सुविधा नाही. त्या उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

खते, औषधे महागतात, मग शेतमालाचे भाव का वाढत नाहीत?दरवर्षी पेरणीचा हंगाम आला की, रासायनिक खते, फवारणीची औषधे महागतात; परंतु दर वर्षाला शेतमालाचे भाव वाढत नाहीत. जोपर्यंत शेतमालाला सन्मानजनक दर मिळत नाही. तोपर्यंत शेतकरी आणि शेतीचा विकास होणार नसल्याचे मत मोपचे राजू खरडे यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोला