शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

संगणकीय सात-बाराचे तीनतेरा

By admin | Updated: June 28, 2014 22:40 IST

सात-बारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तलाठी कार्यालयात या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत.

बुलडाणा : राज्याच्या महसूल विभागात सध्या ई-गव्हर्नन्सचा बोलबाला आहे. अचुकता, तत्परता साधत कामात गतिमानता आणण्यासाठी शेतकर्‍यांसाठी उपयुक्त सात-बारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंमबजावणीबाबत जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तलाठी कार्यालयात या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत. संगणकावरील छपाईचे सात-बारा उतारे देण्याचे तहसीलदारांचे एक वषार्पुवीच सर्व तलाठय़ांना आदेश दिले. मात्र अनेक तालुक्यातील विविध भागात आजही हस्तलिखीतातील सात-बारे दिले जातात. कामात गतिमानता नसल्याने शेतकर्‍यांना तासंतास तलाठी कार्यालयात ताटकळत बसावे लागते. एका तलाठय़ांकडे अनेक गावांची सूत्रे असल्याने उतारे मिळविण्यासाठी कार्यालयात शेतकर्‍यांनाची गर्दी वाढत आहे. शासन आपल्या दारी असा नारा प्रशासन देत असला तरी शेतकर्‍यांची गैरसोय कमी होताना दिसत नाही. सध्या पेरणीचे दिवस सुरू झाले आहेत. बँकांमध्ये कर्ज प्रकरणे करण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरु आहे. मात्र कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकर्‍यांना तलाठय़ाच्या दारी हेलपाटे मारावे लागतात. तलाठी मुख्यालयी रहात नसल्याचा फटका शेतकर्‍यांना बसतो. तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेचा खोळंबा होत आहे.