शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

तुरीचे पंचनामे तीन दिवसांत पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:03 IST

अकोला : तूर खरेदीसाठी जिल्हय़ात शेतकर्‍यांकडील तूर खरेदीचे पंचनामे तलाठी व कृषी सहायकांनी तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्हय़ातील मंडळ कृषी अधिकारी आणि महसूल मंडळ अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते. 

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांचे निर्देश मंडळ अधिकार्‍यांची घेतली बैठकपंचनाम्याचे होणार परीक्षण!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तूर खरेदीसाठी जिल्हय़ात शेतकर्‍यांकडील तूर खरेदीचे पंचनामे तलाठी व कृषी सहायकांनी तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्हय़ातील मंडळ कृषी अधिकारी आणि महसूल मंडळ अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते. शासनाच्या अधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’द्वारे हमीदराने तूर खरेदी गत १0 जूनपासून बंद करण्यात आली. त्यानंतर खरेदी केंद्रांवर गत ३१ मेपर्यंंत टोकन देण्यात आलेल्या शेतकर्‍यांची तूर बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय गत २१ जुलै रोजी शासनामार्फत घेण्यात आला. शासन निर्णयानुसार, ३१ ऑगस्टपर्यंंत तूर खरेदी पूर्ण करावयाची आहे. त्यानुसार टोकन देण्यात आलेल्या जिल्हय़ातील १४ हजार ५२४ शेतकर्‍यांची ३ लाख ५२ हजार क्विंटल तूर खरेदीची प्रक्रिया २६ जुलैपासून जिल्हय़ातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या पाचही खरेदी केंद्रांवर सुरू करण्यात आली आहे. टोकन देण्यात आलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांची तूर खरेदीची प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंंत पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांच्या घरोघरी जाऊन तलाठी व कृषी सहायकांनी तुरीचे पंचनामे करण्याचे काम तीन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हय़ातील मंडळ कृषी अधिकारी आणि महसूल मंडळ अधिकारी उपस्थित होते.

सात-बारा ‘अपडेट’ करा! जिल्हय़ातील शेतकर्‍यांना १५ ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सात-बारा वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी संगणकीकृत सात-बारातील त्रुटी दुरुस्त सात-बारा तातडीने ‘अपडेट’ करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी या बैठकीत दिले.

पंचनाम्याचे होणार परीक्षण!तूर खरेदीसाठी करण्यात आलेल्या पंचनाम्याचे परीक्षण नायब तहसीलदारांकडून करण्यात येणार आहे, तसेच जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून ट्रेडर्सची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तुरीचे पंचनामे काटेकोरपणे करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.