शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:06 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिला.

ठळक मुद्दे‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकार्‍यांना आदेश‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्हाधिकार्‍यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ घेतली. त्यामध्ये कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसह इतर विषयांची जिल्हानिहाय माहिती संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली. राज्य शासनामार्फत  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ऑनलाइन भरून घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंंत आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी पात्र थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याचे काम १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अकोला जिल्हय़ासह राज्यातील सर्वच जिल्हाधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. कर्जमाफी योजनेच्या अकोला जिल्हय़ातील अंमलबजावणीची माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. कर्जमाफीसाठी पात्र ठरणारे जिल्हय़ातील शेतकरी व त्यापैकी २३ ऑगस्टपर्यंंत कर्जमाफीचे शेतकर्‍यांकडून ऑनलाइन भरून घेण्यात आलेल्या अर्जांंची माहितीही जिल्हाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’मध्ये दिली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह कृषी, जिल्हा उपनिबंधक व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सुटीच्या तीन दिवसातही भरले जाणार कर्जमाफीचे अर्ज!मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, थकबाकीदार शेतकर्‍यांकडून कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम १५ सप्टेंबरपर्यंंत पूर्ण करण्यासाठी २५, २६ व २७ ऑगस्ट या सुटीच्या तीन दिवसातही जिल्हय़ातील सेतू केंद्रांवर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

पिके, जलसाठय़ाचा घेतला आढावा!कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसह जिल्हय़ात आतापर्यंंत झालेला पाऊस, खरीप पिकांची परिस्थिती, धरणांमधील उपलब्ध जलसाठय़ाचा आढावादेखील मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडून घेतला.