शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जलयुक्तची कामे जूनअखेर पूर्ण करा!

By admin | Updated: May 11, 2017 07:17 IST

जलसंधारण मंत्र्यांचे बैठकीत निर्देश

अकोला : गेल्या दोन वर्षांच्या काळानंतरही अपूर्ण असलेली जलयुक्त शिवार आराखड्यातील कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नियोजन भवनमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.यावेळी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर विजय अग्रवाल, खासदार संजय धोत्रे, आमदार सर्वश्री गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, कृषी सहसंचालक एस.आर. सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.२०१६-१७ वर्षात १२५ गावांमध्ये विविध यंत्रणेद्वारे ७९२ कामे पूर्ण झाली. त्यासाठी एकूण १२.८४ कोटी रुपये निधी खर्च झाला. २०१५-१६ मध्ये गाळ काढण्याच्या मोहिमेत खोलीकरण, रुंदीकरणाची ४७३ कामे करण्यात आली. त्यामध्ये ३४.६६ लक्ष घ.मी. गाळ काढण्यात आला, तर सन २०१६-१७ या वर्षात ७३ कामांतून १२.३३ लक्ष घ.मी. गाळ काढण्यात आला. चालू वर्षात जिल्ह्यातील १४४ गावांची निवड करण्यात आली. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्यास ३५०० शेततळ्यांचे लक्ष्यांक आहे. त्यापैकी ३८१ शेततळे पूर्ण झाली आहेत. ३५३ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी गाळ काढून शेतात वापरण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासनाने सुरू केली. लघू पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलाव इत्यादी ५० तलावांतील गाळ स्थानिक शेतकऱ्यांना मोफत दिला जात आहे. त्यांना स्वखर्चाने वाहून न्यावा लागणार आहे. गाळ काढणाऱ्या यंत्रणेच्या इंधनाचा खर्च शासन करणार आहे. शेतकऱ्यांनी गाळ काढण्याच्या मागणीचे प्रस्ताव तहसीलदारांना सादर करावे, असे आवाहनही प्रा. शिंदे यांनी केले.