शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकाकडे तक्रार; व्यापा-यांनी केली खरेदी बंद

By admin | Updated: April 10, 2015 02:09 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार, शेतकरी त्रस्त

अकोला: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी रिंगण करून शेतमालाची खरेदी करीत असल्याचा प्रकार बुधवारी पुन्हा उघडकीस आला. याप्रकारातून शेतकर्‍यांची लूट होत असल्याने शेतकर्‍याने प्रशासकाकडे तक्रार केल्यामुळे गुरुवारी व्यापार्‍यांनी प्रशासन व अडत्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सोयाबीनची खरेदी बंद केली. त्यामुळे शेतकर्‍यांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत गत काही महिन्यांपासून व्यापारी रिंगण करून शेतमालाची खरेदी करीत आहेत. ८ एप्रिल रोजी हिंगणी येथील शेतकरी गोपाल दातकर यांच्या शेतमालाची खरेदी रिंगण करून करण्यात आली. यामध्ये शेतकर्‍यांना नुकसानाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अडते राजेंद्र जोशी यांनी प्रशासकाकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ८ एप्रिल रोजी त्यांच्या अडतमध्ये गोपाल दातकर यांनी सोयाबीन विक्रीला आणले होते. सोयाबीनचा खुला ढीग झाल्यानंतर हर्रासीसाठी बोली लावण्याकरिता सोयाबीनचे दोन खरेदीदार वगळता अन्य खरेदीदार बोली लावण्यास तयार नव्हते. प्रत्येकजण मोबाईलवर बोलत एकमेकांना संशयास्पद इशारे करीत होते. यावरून खरेदीदार आपसात संगनमत करून सोयाबीनचा माल खरेदी करतात. तसेच रिंगण करून शेतकर्‍यांची फसवणूक व पिळवणूक करतात. या प्रकारची वागणूक यापूर्वीही शेतकर्‍यांना देण्यात आली आहे. अकोला बाजार समितीत आपसात संगनमत करून व रिंगण करून खरेदीदार बाजार समितीच्या प्रतिष्ठेला धक्का देत आहेत. तसेच शेतकरी, बाजार समिती प्रशासन व शासनाची फसवणूक करीत आहेत. या प्रकारात सहभागी असलेले सोयाबीनचे खरेदीदार दयाल एनर्जीचे भिकू काबरा, मारोती उद्योगचे शरद सारडा यांच्यासह अन्य व्यापार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.